शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते तय्थहीन आरोप करीत आहेत. जनता कुणाला बक्षीस देईल, हे मतपेट्यातून स्पष्ट होईलच. काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले. कामाच्या मुद्यावर दोन्ही शहराध्यक्ष आमने-सामने आले असून, येत्या काळात राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

गेल्या १५ वर्षांत महापालिकेत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा व याच्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली होती. त्यावर दटके यांनी भाजपची बाजू मांडली. अनेक वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने शहराचा सत्यानाश केला व नागपूरला एक मोठे खेडे बनविले. भाजपने मोठ्या खेड्याला शहराचे स्वरूप दिले आहे. जनता भाजपवर खूश आहे. आज भाजपच्या काळातील रस्ते, पूल, मेट्रो बघा. नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनत असल्याचे बघून काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून काहीतरी आरोप करीत सुटली आहे. राजकारणासाठी त्यांनी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण हे सगळे का करू शकलो नाही याचे आत्मपरीक्षणसुद्धा करावे, असे दटके म्हणाले.

अगोदर स्वत:ची गटबाजी सांभाळा

दटके यांनी गटबाजीवरून काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले. वेगवेगळे गट असलेल्या काँग्रेसने इतर पक्षांना उपदेश देऊ नये. ज्यांना अंतर्गत वादामुळे पंजा फ्रीज करावा लागला होता. ज्यांनी आपल्याच पक्षाचे बी फॉर्म दोन-तीन जणांना दिले होते. ज्यांचे नगरसेवक त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना माईक फेकून मारत आहेत, ते महापालिकेत सत्तेत येऊन काय करणार, हे जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, असे दटके म्हणाले.

काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार

भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार आहे? विकास ठाकरे स्वत: महापौर असताना त्यांनी काय दिवे लावले, महापौर म्हणून ते एक दिवसही धड सभागृह चालवू शकले नाही. अशाच नाकर्तेपणामुळे नागपूरची जनता त्यांना भविष्यातही घरीच बसविणार आहे, असे प्रतिपादन मेश्राम यांनी केले.