शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते तय्थहीन आरोप करीत आहेत. जनता कुणाला बक्षीस देईल, हे मतपेट्यातून स्पष्ट होईलच. काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले. कामाच्या मुद्यावर दोन्ही शहराध्यक्ष आमने-सामने आले असून, येत्या काळात राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

गेल्या १५ वर्षांत महापालिकेत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा व याच्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली होती. त्यावर दटके यांनी भाजपची बाजू मांडली. अनेक वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने शहराचा सत्यानाश केला व नागपूरला एक मोठे खेडे बनविले. भाजपने मोठ्या खेड्याला शहराचे स्वरूप दिले आहे. जनता भाजपवर खूश आहे. आज भाजपच्या काळातील रस्ते, पूल, मेट्रो बघा. नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनत असल्याचे बघून काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून काहीतरी आरोप करीत सुटली आहे. राजकारणासाठी त्यांनी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण हे सगळे का करू शकलो नाही याचे आत्मपरीक्षणसुद्धा करावे, असे दटके म्हणाले.

अगोदर स्वत:ची गटबाजी सांभाळा

दटके यांनी गटबाजीवरून काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले. वेगवेगळे गट असलेल्या काँग्रेसने इतर पक्षांना उपदेश देऊ नये. ज्यांना अंतर्गत वादामुळे पंजा फ्रीज करावा लागला होता. ज्यांनी आपल्याच पक्षाचे बी फॉर्म दोन-तीन जणांना दिले होते. ज्यांचे नगरसेवक त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना माईक फेकून मारत आहेत, ते महापालिकेत सत्तेत येऊन काय करणार, हे जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, असे दटके म्हणाले.

काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार

भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार आहे? विकास ठाकरे स्वत: महापौर असताना त्यांनी काय दिवे लावले, महापौर म्हणून ते एक दिवसही धड सभागृह चालवू शकले नाही. अशाच नाकर्तेपणामुळे नागपूरची जनता त्यांना भविष्यातही घरीच बसविणार आहे, असे प्रतिपादन मेश्राम यांनी केले.