शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 21:50 IST

Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे.

नागपूर : कोराडी येथे प्रस्तावीत १३२० मेगावॅटच्या विस्तारित वीज प्रकल्पास आता काँग्रेसनेही विरोध केला आहे. कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. या प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

कोराडी येथील वीज प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन नवीन युनीट प्रस्तावित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता पर्यावरणीय जनसुनावणी घेण्याचू सूचना जारी केली आहे. कोराडी, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्पापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे आधीच माझ्या पश्चिम नागपूरकर त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतरही ‘फ्लू गॅस डेल्फ्रिनिंग प्लांट’ स्थापित केलेला नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. असे असताना आता पुन्हा कोराडी येथे आणखी दोन युनीट उभारले जात आहे. याला आपला तीव्र विरोध असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जोपर्यंत सध्याच्या प्लांटमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व शहर सचिव संदेश सिंगलकर यांनीही या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले यांनी संबंधित पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

मे च्या उन्हात भरदुपारी सुनावणी कशासाठी?

- नागपूरचे तापमान सतत वाढत आहे. नागरिक उन्हाच्या झळांनी आजारी पडत आहे. असे असताना २९ मे रोजी भरदुपारी १२:३० वाजता ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सूर्याघात आणि मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लोकांना एकत्र येण्याची परवानगी देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असल्यामुळे सुनावणीला हजारो लोक येण्याची शक्यता आहे. कोराडी प्लांटच्या आवारात ही सुनावणी होणार आहे. अनेक लोक कडक उन्हामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.

लोकसहभाग नसेल तर जनसुनावणीचा संपूर्ण उद्देशच फोल ठरेल. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पVikas Thackreyविकास ठाकरे