शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 21:50 IST

Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे.

नागपूर : कोराडी येथे प्रस्तावीत १३२० मेगावॅटच्या विस्तारित वीज प्रकल्पास आता काँग्रेसनेही विरोध केला आहे. कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. या प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

कोराडी येथील वीज प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन नवीन युनीट प्रस्तावित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता पर्यावरणीय जनसुनावणी घेण्याचू सूचना जारी केली आहे. कोराडी, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्पापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे आधीच माझ्या पश्चिम नागपूरकर त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतरही ‘फ्लू गॅस डेल्फ्रिनिंग प्लांट’ स्थापित केलेला नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. असे असताना आता पुन्हा कोराडी येथे आणखी दोन युनीट उभारले जात आहे. याला आपला तीव्र विरोध असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जोपर्यंत सध्याच्या प्लांटमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व शहर सचिव संदेश सिंगलकर यांनीही या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले यांनी संबंधित पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

मे च्या उन्हात भरदुपारी सुनावणी कशासाठी?

- नागपूरचे तापमान सतत वाढत आहे. नागरिक उन्हाच्या झळांनी आजारी पडत आहे. असे असताना २९ मे रोजी भरदुपारी १२:३० वाजता ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सूर्याघात आणि मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लोकांना एकत्र येण्याची परवानगी देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असल्यामुळे सुनावणीला हजारो लोक येण्याची शक्यता आहे. कोराडी प्लांटच्या आवारात ही सुनावणी होणार आहे. अनेक लोक कडक उन्हामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.

लोकसहभाग नसेल तर जनसुनावणीचा संपूर्ण उद्देशच फोल ठरेल. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पVikas Thackreyविकास ठाकरे