शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 21:50 IST

Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे.

नागपूर : कोराडी येथे प्रस्तावीत १३२० मेगावॅटच्या विस्तारित वीज प्रकल्पास आता काँग्रेसनेही विरोध केला आहे. कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. या प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

कोराडी येथील वीज प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन नवीन युनीट प्रस्तावित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता पर्यावरणीय जनसुनावणी घेण्याचू सूचना जारी केली आहे. कोराडी, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्पापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे आधीच माझ्या पश्चिम नागपूरकर त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतरही ‘फ्लू गॅस डेल्फ्रिनिंग प्लांट’ स्थापित केलेला नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. असे असताना आता पुन्हा कोराडी येथे आणखी दोन युनीट उभारले जात आहे. याला आपला तीव्र विरोध असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जोपर्यंत सध्याच्या प्लांटमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व शहर सचिव संदेश सिंगलकर यांनीही या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले यांनी संबंधित पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

मे च्या उन्हात भरदुपारी सुनावणी कशासाठी?

- नागपूरचे तापमान सतत वाढत आहे. नागरिक उन्हाच्या झळांनी आजारी पडत आहे. असे असताना २९ मे रोजी भरदुपारी १२:३० वाजता ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सूर्याघात आणि मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लोकांना एकत्र येण्याची परवानगी देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असल्यामुळे सुनावणीला हजारो लोक येण्याची शक्यता आहे. कोराडी प्लांटच्या आवारात ही सुनावणी होणार आहे. अनेक लोक कडक उन्हामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.

लोकसहभाग नसेल तर जनसुनावणीचा संपूर्ण उद्देशच फोल ठरेल. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पVikas Thackreyविकास ठाकरे