शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडूनच आता प्रशासनावर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ...

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ऐकून घ्यायला तयार नाही. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण जनतेकडे लक्षच नाही. नेते, मंत्री यांना जनतेची पर्वाच नसल्यासारखे वागत असल्याची ओरड काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून व्हायला लागली आहे. ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असतानाही कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पडून असलेले पाच व्हेंटिलेटर सुरू झाले नाही. रुग्ण वाढत असताना खाटांची व्यवस्था नाही. रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांना शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा नाही. कोरोनाच्या तपासणीसाठी मुबलक प्रमाणात कीट उपलब्ध नाही. आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण अत्यल्प आहे. रुग्णांना गृहविलगीकरणाची व्यवस्था नाही. यासंदर्भात काँग्रेसकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. जिल्हा परिषदेचा अख्खा कारभार केदार यांच्या मार्गदर्शनात सुरू असताना, ग्रामीणमध्ये लोकं उपचारांअभावी मृत्यू होत असतानाही उपाययोजना नाही. २२ लाख लोकसंख्येसाठी केवळ ९४ व्हेंटिलेटर, लोकसंख्येच्या एक टक्काही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रस्थ असतानाही लोकांना उपचार मिळत नसल्याची खंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडे ग्रामीण जनतेसाठी वेळच नसल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

- कार्यकर्त्यांचे ऐकत नसेल तर करणार काय?

ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नाही. तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे. कोणी ऐकत नसल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणावर नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रा) चे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव, राजा तिडके, जि.प. सदस्य शालिनी देशमुख, सरपंच शाहिस्ता पठाण, डॉ. सुधीर नाखले, निकेश भोयर, आदी कार्यकर्ते बसणार आहेत.