शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

काँग्रेसकडूनच आता प्रशासनावर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ...

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ऐकून घ्यायला तयार नाही. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण जनतेकडे लक्षच नाही. नेते, मंत्री यांना जनतेची पर्वाच नसल्यासारखे वागत असल्याची ओरड काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून व्हायला लागली आहे. ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असतानाही कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पडून असलेले पाच व्हेंटिलेटर सुरू झाले नाही. रुग्ण वाढत असताना खाटांची व्यवस्था नाही. रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांना शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा नाही. कोरोनाच्या तपासणीसाठी मुबलक प्रमाणात कीट उपलब्ध नाही. आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण अत्यल्प आहे. रुग्णांना गृहविलगीकरणाची व्यवस्था नाही. यासंदर्भात काँग्रेसकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. जिल्हा परिषदेचा अख्खा कारभार केदार यांच्या मार्गदर्शनात सुरू असताना, ग्रामीणमध्ये लोकं उपचारांअभावी मृत्यू होत असतानाही उपाययोजना नाही. २२ लाख लोकसंख्येसाठी केवळ ९४ व्हेंटिलेटर, लोकसंख्येच्या एक टक्काही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रस्थ असतानाही लोकांना उपचार मिळत नसल्याची खंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडे ग्रामीण जनतेसाठी वेळच नसल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

- कार्यकर्त्यांचे ऐकत नसेल तर करणार काय?

ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नाही. तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे. कोणी ऐकत नसल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणावर नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रा) चे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव, राजा तिडके, जि.प. सदस्य शालिनी देशमुख, सरपंच शाहिस्ता पठाण, डॉ. सुधीर नाखले, निकेश भोयर, आदी कार्यकर्ते बसणार आहेत.