शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

काँग्रेसचा दावा २८० ची मॅजिक फिगर गाठू, भाजप म्हणते अबकी बार ४०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 07:00 IST

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते.

ठळक मुद्देभाजपचे ग्रामीणमधील ४२ मतदार फुटल्याचा दावा भाजपमध्ये प्रत्येक केंद्रावर काँग्रेसला गळती

 

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते. मतदानानंतर भाजपने ३४८ मते पक्के मिळतील, प्रसंगी ४०० पर्यंत झेप घेऊ, असा दावा केला आहे. काँग्रेस नेतेही मॅजिक फिगर गाठूच असे ठासून सांगत असून, २८० ते २८७ मते घेण्याचा दावा करीत आहेत.

जिल्हा परिषदेत व पंचायत समित्यांचे सभापती असे एकूण ७१ व नगर परिषद आणि नगरपंचायतचे ३३३ मतदार होते. नागपूर महापालिकेत १५५ मतदार होते. यापैकी नागपुरातील ४ मतदारांनी, तर कामठी नगर परिषदेच्या एका मतदाराने मतदान केले नाही. मतदान आटोपल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडींची चर्चा उघड होण्यास सुरुवात झाली आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला छोटू भोयर यांना बदलून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. आता केदार यांनी नागपूर ग्रामीणमधील भाजपची ४२ मते वळविली, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. काँग्रेसचे एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी, शिवसेनेने साथ सोडली नाही, असेही ते ठामपणे सांगत आहेत. भाजपचा अतिआत्मविश्वास तुटलेला दिसला, असे केदार समर्थक आता अतिआत्मविश्वासाने सांगत आहेत.

निवडणुकीनंतर भाजपच्या गोटात उत्साह दिसून आला. गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते ताकदीने निवडणुकीत उतरले होते. भाजपचे लोक नाराजी असली तरी बोलून दाखवितात, पक्षाशी गद्दारी करीत नाहीत. त्यामुळे एकही मत फुटू शकत नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला. उलट, काँग्रेसला प्रत्येक मतदान केंद्रावर गळती लागली. राष्ट्रवादी व शिवसेनेने आघाडी धर्म किती पाळला हे निकालानंतर काँग्रेसला दिसेलच, असे चिमटेही भाजप नेते काढत आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला अधिकृत उमेदवार बदलविणाऱ्या काँग्रेसने विजयाचे स्वप्न पाहू नये, असा सल्लाही भाजप नेत्यांनी दिला आहे.

निकाल फिरविणारे प्रश्न

- नागपूर महापालिकेत भाजप एकसंघ राहिला का?

- काटोलात चरणसिंग ठाकूर गटाच्या नगरसेवकांनी कुणाची साथ दिली?

- पारशिवनीत सेनेने काँग्रेसचा बाण ताणला?

- बसपाच्या ८ मतदारांनी नेमके कुणाला मतदान केले?

- कामठी तहसील मतदान केंद्रावर सर्वाधिक ५५ मतदार होते. कामठी कुणासोबत राहिली?

- राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला का?

अशा घडल्या घडामोडी

- काँग्रेसने पाठिंबा काढून घेतलेले रवींद्र भोयर हे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात एकटेच पोहोचले.

- अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी कामठीच्या तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर ते एकटेच मतदानासाठी पोहोचले.

- भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवार होते; पण मतदार नव्हते. त्यांनी दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत समर्थकांकडून आढावा घेतला.

- उमरेडमध्ये भाजपच्या २२ नगरसेवकांनी एकसंध येऊन मतदान केले.

- जिल्ह्यात सर्वांत आधी शंभर टक्के मतदान करण्यात सावनेर आघाडीवर राहिले. येथे सावनेर नगर परिषदेच्या २३, तर खापा नगर परिषदेच्या २० मतदारांनी मतदान केले.

- रामटेकमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत एकही मतदार मतदानासाठी पोहोचला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत धाकधूक वाढली होती.

फटाके कोराडी-महादुलातच फुटणार

- मंगेश देशमुख हे महादुला नगर पंचायतमध्ये नगरसेवक आहेत.

बावनकुळे यांचे कोराडी येथे वास्तव्य आहे. त्यामुळे कुणीही जिंकले तरी विजयाचे फटाके कोराडी-महादुला परिसरातच फुटणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक