शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

काँग्रेसचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

By admin | Updated: February 9, 2015 01:01 IST

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

बाला बच्चन : पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्हानिहाय दौरानागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कॉंग्रेसचे सचिव बाला बच्चन यांनी रविवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक र्त्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे होते.हा अ‍ॅक्शन प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी त्यावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांची मते व सूचना विचारात घ्याव्या, अशी भूमिका पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची आहे. योग्य सूचनांचा यात समावेश केला जाईल. यासाठी प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती बच्चन यांनी दिली.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अ.भा.काँगे्रस कमिटीच्या कार्यक्रमानुसार नियोजन करण्यात आले आहे. यातून बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. पक्षाने दिलेल्या पदाचा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबतच पक्ष संघटनेसाठी मदत होते की नाही. याचाही विचार केला व्हावा. पक्षाची आचारसंहिता सर्वांनाच पाळावी लागेल, असे मत त्यांनी मांडले.पक्षाच्या विविध पातळीवरील पदाधिकारी निवडण्याचे व स्थानिक निवडणुकीत आघाडीचे अधिकारी शहर काँग्रेस कमिटीला द्यावे, अशी सूचना माजी मंत्री नितीन राऊ त यांनी मांडली. युवक काँग्रेस हा पक्षाचा कणा आहे. यात निवडणुकीची पद्धती बंद करावी, असे मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी मांडले.प्रदेश काँग्रेसचे सचिव मुन्ना ओझा यांनी पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारसरणी, नेतृत्व, संघटनेत बदल, जाहीरनामा, पक्षाची बांधणी, शिस्त व जबाबदारी अशा १४ मुद्यावर मते व सूचना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी यांनी देशभरातील युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांशी चर्चा करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करावा, अशी सूचना अतुल कोटेचा यांनी मांडली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील पराभामुळे खचून न जाता कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रफुल्ल गुडधे यांनी केले. उमाकांत अग्निहोत्री, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, दीपक कापसे, विजय बाभरे, अभिजित वंजारी, शेख हुसैन, सुरेश पिल्लेवार, इब्राहीम चुडीवाले आदींनी मनोज साबळे आदींनी विचार मांडले. यावेळी माजी आमदार यादवराव देवगडे, अरुण डवरे व्यासपीठावर होते. डॉ. गजराज हटवार यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)