शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:44 IST

काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपुगलिया व प्रदेश काँग्रेसचा एकाचवेळी वेगवेगळा मेळावा :

प्रदेशच्या रॅलीत चव्हाण तर पुगलियांच्या रॅलीत पाच माजी मंत्रीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार विरुद्ध संघर्षांचा बिगुल फुंकत ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘विभागीय जनआक्रोश मेळावा’ आयोजित केला आहे तर तेथेच त्याच दिवशी, त्याच वेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी बाजूच्याच मैैदानावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. तीत विदर्भातील ‘निष्ठावान’ असंतुष्ट नेत्यांना निमंत्रित केले आहे. आमने-सामने होत असलेल्या या दोन मेळाव्यांमुळे काँग्रेसमधील ‘आक्रोश’ प्रखरतेने चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात येत चंद्रपूरच्या मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच सोमवारी पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी व कामगार रॅली घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुगलिया यांनी मंगळवारी नागपुरात येत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींची भेट घेत या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या वेळी या सर्व नेत्यांची सिव्हील लाईन्समधील चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तीत पुढील कार्यक्रमांची रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर पुगलिया यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरातील संबंधित नेते मेळाव्याला येणार असून शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे देखील समर्थकांसह उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. माजी खा. गेव्ह आवारी यांनी नागपुरातील संबंधित नेत्यांसह तीन हजार कार्यकर्ते चंद्रूपरच्या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी यापूर्वीच प्रदेश काँग्रेसवर अविश्वास दाखवित ‘विदर्भ काँग्रेस’ स्थापन करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे.अशोक चव्हाण ‘केअर टेकर’प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी हे सद्यस्थितीत ‘केअर टेकर’ आहेत. प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्व अधिकार उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत. माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार व अनंतराव घारड यांच्या सल्ल्याप्रमाणे चव्हाण वागत आहेत. मी अ.भा. काँग्रेस समितीचा सदस्य आहे. असे असतानाही आपले नाव प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले नाही. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ प्रदेश प्रतिनिधींची नावे निश्चित केली. पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती लुडबूड करीत आहेत.- नरेश पुगलिया, माजी खासदार