शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:44 IST

काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपुगलिया व प्रदेश काँग्रेसचा एकाचवेळी वेगवेगळा मेळावा :

प्रदेशच्या रॅलीत चव्हाण तर पुगलियांच्या रॅलीत पाच माजी मंत्रीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार विरुद्ध संघर्षांचा बिगुल फुंकत ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘विभागीय जनआक्रोश मेळावा’ आयोजित केला आहे तर तेथेच त्याच दिवशी, त्याच वेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी बाजूच्याच मैैदानावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. तीत विदर्भातील ‘निष्ठावान’ असंतुष्ट नेत्यांना निमंत्रित केले आहे. आमने-सामने होत असलेल्या या दोन मेळाव्यांमुळे काँग्रेसमधील ‘आक्रोश’ प्रखरतेने चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात येत चंद्रपूरच्या मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच सोमवारी पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी व कामगार रॅली घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुगलिया यांनी मंगळवारी नागपुरात येत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींची भेट घेत या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या वेळी या सर्व नेत्यांची सिव्हील लाईन्समधील चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर बैठक झाली. तीत पुढील कार्यक्रमांची रणनीती आखण्यात आली. बैठकीनंतर पुगलिया यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरातील संबंधित नेते मेळाव्याला येणार असून शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे देखील समर्थकांसह उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. माजी खा. गेव्ह आवारी यांनी नागपुरातील संबंधित नेत्यांसह तीन हजार कार्यकर्ते चंद्रूपरच्या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी यापूर्वीच प्रदेश काँग्रेसवर अविश्वास दाखवित ‘विदर्भ काँग्रेस’ स्थापन करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे.अशोक चव्हाण ‘केअर टेकर’प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी हे सद्यस्थितीत ‘केअर टेकर’ आहेत. प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीनंतर सर्व अधिकार उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत. माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार व अनंतराव घारड यांच्या सल्ल्याप्रमाणे चव्हाण वागत आहेत. मी अ.भा. काँग्रेस समितीचा सदस्य आहे. असे असतानाही आपले नाव प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले नाही. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार चव्हाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ प्रदेश प्रतिनिधींची नावे निश्चित केली. पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्ती लुडबूड करीत आहेत.- नरेश पुगलिया, माजी खासदार