शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

संमेलनाध्यक्ष-महामंडळात शह-काटशहचा खेळ ?

By admin | Updated: February 1, 2017 02:32 IST

साहित्य आणि राजकारण या तशा दोन ध्रुवावरच्या दोन गोष्टी. झालेच तर एखादा साहित्यिक राजकारणात किंवा

आयोजक गोंधळात : पत्रिकेत नाव नाही, मग सहभागाचे निमंत्रण आले कसे? शफी पठाण ल्ल नागपूर साहित्य आणि राजकारण या तशा दोन ध्रुवावरच्या दोन गोष्टी. झालेच तर एखादा साहित्यिक राजकारणात किंवा राजकारणातला एखादा साहित्यविश्वात असू शकतो. परंतु साहित्याच्या क्षेत्रात मात्र राजकारण कुणालाच अपेक्षित नाही. डोंबिवलीत आयोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रित साहित्यिकांची नावे ठरवताना मात्र असे ‘राजकारण’ घडल्याची चर्चा असून, संमेलनाध्यक्ष व साहित्य महामंडळात रंगलेल्या या शह-काटशहाचा खेळाचा फटका निमंत्रितांना बसल्याचे बोलले जात आहे. नागपुरातील काही साहित्यिकांना संमेलनाच्या विविध सत्रात सहभागाचे निमंत्रण आले आहे. परंतु पत्रिकेत मात्र कुठेही त्यांचे नाव नसल्याने संमेलनाला जायचे की नाही, या द्विधामनस्थितीत ते सापडले आहेत. साहित्य संमेलनात कोणाला निमंत्रित करायचे, याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व आयोजक संस्था हे मिळून घेत असतात. काही नावे घटक संस्थांमार्फत जात असतात. दोघांच्याही संमतीने एकदा का ही नावे ‘फायनल’ झाली की मगच कार्यक्रम पत्रिका छापायला पाठविली जाते. पत्रिका छापायला गेल्यानंतर कुठले नाव ठरविण्यात आले असे सहसा होत नाही. शहरातील प्रसिद्ध लेखिका अरुणा सबाणे आणि डॉ. अमृता इंदूरकर यांच्यासह आणखीही काही साहित्यिकांचे कार्यक्रम पत्रिकेत कुठेच नाव नाही. परंतु संमेलनात सहभागाचे पत्र त्यांना मिळाले आहे. या पत्रावर स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांची स्वाक्षरी आहे. पत्रिकेत या नावांचा उल्लेख नाही, घटक संस्थांनी ती नावे पाठवलेली नाहीत, मग ही नावे आलीत कुठून, हा खरा प्रश्न आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती घेतली असता असे कळले की, संमेलनाध्यक्षांनी आपल्या अधिकारात काही नावे आयोजकांना सूचविली, आयोजकांनी ती नोंदवूनही घेतली. परंतु ही नावे संबधित घटक संस्थांकडून न आल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमावर बोेट ठेवत ती नाकारली. संमेलनाध्यक्षांना दुखवायचे नसल्याने आणि तिकडे महामंडळ नियमाचे कारण पुढे करीत असल्याने कैचीत सापडलेले आयोजक पार गोंधळले व या विशिष्ट नावांशिवाय पत्रिका ‘फायनल’ झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु सहभागाच्या निमंत्रणाचे पत्र गेल्याने आता त्यांना नाही बोलावले तर चुकीचा संदेश जाईल, असे आयोजकांना वाटले व पत्रिकेत नाव नसतानाही वर उल्लेखित साहित्यिकांना पुन्हा निमंत्रणाचे ‘फोन कॉल्स’ गेल्याचेही या सूत्रांनी सांगितले. संमेलनात सहभागाचे निमंत्रण पत्र मला आले. त्यानुसार पत्रिकेत नाव असणे अपेक्षितच होते. परंतु प्रत्यक्ष पत्रिका हातात आली तेव्हा मात्र नाव दिसले नाही. आयोजकांकडे चौकशी केली असता त्यांनी तुम्ही निमंत्रित आहात आणि तुम्हाला यायचेच आहे, असे सांगितल्याने मी संमेलनाला जात आहे. - अरुणा सबाणे मी तसेही संमेलनाला जाणारच होते. आता मला आयोजकांकडून सहभागाबाबत निमंत्रणाचा फोन आला आहे. त्यामुळे मी संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. राहिले गोष्ट पत्रिकेतील नावाची तर इतक्या मोठ्या आयोजनात अशी चूक घडू शकते. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही - डॉ. अमृता इंदूरकर