शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

‘कोरोना’ नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 11:32 IST

SSC exam Nagpur News ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल व ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन होईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देदहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण राज्य शिक्षण मंडळ अध्यक्षांचा दावा

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. अद्यापपर्यंत यासंबंधाची अधिकृत माहिती विभागीय मंडळ कार्यालयांना मिळालेली नाही. मात्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’शी चर्चेत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल व ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन होईल, असे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’ नियमांनुसार परीक्षा केंद्रांमध्ये ‘एक बेंच, एक विद्यार्थी’ योजनेंतर्गत परीक्षार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. एका वर्गखोलीत केवळ २५ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका अगोदरच केंद्रांवर पोहोचविण्यात येतील. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ अनिवार्य करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

याअगोदर शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे आयोजन केले होते. एकाही विद्यार्थ्याला ‘कोरोना’चा संसर्ग झाला नाही. ही बाब लक्षात घेता परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

‘ऑनलाईन’ होत आहे अभ्यास

‘कोरोना’चा संसर्ग लक्षात मंडळाने परीक्षेचा अभ्यासक्रम कमी केला आहे. शाळांकडून ‘ऑनलाईन’ अध्ययन सुरू आहे. यासोबतच टीव्ही, रेडियो व इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत आता प्रत्यक्ष वर्गदेखील होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :examपरीक्षा