शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

संशोधन लोकांपर्यंत मातृभाषेत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:05 IST

संशोधन हे स्थानिक भाषेत, मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले .

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूआंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शास्त्रज्ञांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणे म्हणजे विज्ञान होय. कुठलेही वैज्ञानिक संशोधन हे तेव्हाच फायद्याचे ठरेल जेव्हा त्या संशोधनाचे फायदे सामान्य लेकांपर्यंत पोहोचतील. यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे. ही मोहीम लोकचळवळ होणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ते संशोधन त्याचे लाभ लोकांना समजतील, त्यामुळे संशोधन हे स्थानिक भाषेत, मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे कले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) येथे १५ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीवविज्ञान, चिकित्सा आणि पर्यावरणात धातू आयन आणि कार्बनिक प्रदूषक’ या विषयावर आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. त्यामुळे संशोधक व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नायर हॉस्पिटल मुंबईच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सुनाली खन्ना होत्या. तर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, नीरीचे निदेशक डॉ. राकेश कुमार, प्रो. डॉ. पॉल टेक्नवोव (युएसए), आरोग्य मंत्रालय नवी दिल्लीचे डॉ. टी.के. जोशी आणि डॉ. हेमंत पुरोहित प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी नीरी परिसरात वृक्षरोपण केले. चर्चासत्राच्या अध्यक्ष डॉ. सुनाली खन्ना यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राबाबत माहिती दिली. डॉ. पॉल, डॉ.टी.के. जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. डॉ. राकेश कुमार यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. हेमंत पुरोहित यांनी आभार मानले.अन् उपराष्ट्रपतींनी मराठीतून साधला संवादउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाषणाची सुरुवातच नमस्कार करीत मराठीतून केली. येथे येऊन मला खूप आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भाषण इंग्रजीतून केले. दरम्यान एकदा हिंदीतूनही संवाद साधला.एस समाज एक लक्ष्य. जलजागृती अभियानयावेळी निरीतर्फे ‘एक समाज एक लक्ष हा लोकसहभागावर आधारित जलजागृतीपर अभियानाचा शुभारंभ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आला. या मोेहिमेअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे लोकसहभागाने पुनरुज्जीवन तसेच जलसाक्षरता व संवर्धन या विषयीचे उपक्रम स्वयंसेवी सस्थांच्या माध्यामतून निरीतर्फे हाती घेण्यात येणार आहे.

 वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेतील संशोधन बाहेर काढून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. हाच या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे, असे नीरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षा आणि मुंबई येथील मुंबई महापालिकेच्या नायर हॉस्पिटल दंत महाविद्यालयाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सुनाली खन्ना यांनी सांगितले.

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू