शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

नागपूरकरांसाठी ‘ताप’ वाढविणारी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST

निशांत वानखेडे नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) द्वारे सादर अलीकडच्या पर्यावरण परिस्थिती अहवालावरून नागपूरकरांसाठी ‘ताप’दायक माहिती ...

निशांत वानखेडे

नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) द्वारे सादर अलीकडच्या पर्यावरण परिस्थिती अहवालावरून नागपूरकरांसाठी ‘ताप’दायक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दशकांत नागपूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. २००० ते २०१९ या काळात सरासरी वार्षिक तापमानात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे आणि हीट वेव्हजच्या इव्हेंटमध्ये ८५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या १९७० पासूनच्या आकडेवारीवरून हवामान बदलाच्या संदर्भातील अभ्यासावरून ही परिस्थिती समोर येत आहे. ४९ वर्षांचा डेटा समोर ठेवून प्रत्येक वर्षातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. यावरून गेल्या ५० वर्षांच्या तुलनेत २०००-२०१९ या दोन दशकांत सरासरी वार्षिक तापमानात मोठी वाढ झाली आहे. २०१० ते २०१९ या दशकात अतिउष्णतेचे दिवस आणि रात्र ९.३ टक्क्यांनी वाढले. अतिउष्ण लहरींचा अभ्यास केला असता १९८० ते २००० पर्यंत दोनदा हीट वेव्हजची परिस्थिती अनुभवली जी २०००-२०१९ च्या काळात १८ पर्यंत वाढली आहे. दिवसाचे कमाल तापमान ३३ अंशापर्यंत व रात्रीचे किमान तापमान २० अंशाच्या आसपास सामान्य मानले जाते. मात्र, दोन दशकांत किमान तापमान ३३.३ अंशापर्यंत तर कमाल तापमान ४५ अंशाच्याही वर जात असून ही धोक्याची घंटा असल्याचे नीरी वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.

तसे हवामान बदल व तापमान वाढीमुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये फारसा बदल झाला नसला तरी पावसाच्या काळामध्ये कमालीचा बदल दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. मागील १० वर्षांत मान्सून काळातील सरासरी पावसामध्ये वाढ झाली आहे; पण पावसाच्या दिवसांमध्ये घट झाली आहे. म्हणजे तो कधी ठरावीक काळात अधिक पडतो; पण बाकी दिवस कोरडे जातात. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले; पण हिवाळा व मान्सून नसलेल्या काळातील पावसाचे प्रमाण ३७.४३ टक्क्यांनी घटले आहे. काही ठरावीक काळात हाेणाऱ्या पावसामुळे महापूर, अवर्षण, इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान व आजार हाेण्याची शक्यता अधिक असते.

अहवालातील ‘हीट’ हायलाइट

- २०००-२०१९ मध्ये सरासरी वार्षिक तापमानात ८० टक्के वाढ.

- दाेन दशकांत हीट इव्हेंट्स ८५ टक्के वाढले. अतिउष्ण दिवस व रात्रीत ९.३ टक्के वाढ.

- १८ अतिउष्ण लहरी २००० ते २०१९ मध्ये. १९८०-२००० पर्यंत केवळ २.

- १६ वेळा सर्फेस टेम्प्रेचर सरासरीपेक्षा वर गेले. १९८० ते २००० पर्यंत ८ वेळा.

- २० वर्षांपैकी १५ वर्षे उष्ण लहरींचे ठरले.

- सरासरी पर्जन्यमान १६.४ टक्क्यांनी वाढले; पण पावसाचे सरासरी दिवस १६ टक्क्यांनी घटले.

- दक्षिणपूर्व मान्सूनच्या दिवसातही १२.२ टक्के घट.