शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

खतटंचाईची नव्हे, दरवाढीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा ...

उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा निकाल लागेल. पाचशे-हजार वाढवायचे व दोन-चारशे रुपये कमी करायचे असे खताबाबत होऊ नये, अशा रोखठोक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत. दरवर्षी खतटंचाईला सामोरे जावे लागते. विशेषत: युरियाच्या बाबतीत हे घडते. असे असले तरी यंदा बळीराजाला खतटंचाईची नव्हे तर दरवाढीची चिंता सतावित आहे. दरवाढ कमी होताच रासायनिक खतांच्या खरेदीवर उड्या पडतील. सध्या नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ९४ हजार १०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात युरियाची समस्या उद‌्भवली होती. एकरी एक ते दीड बॅग युरिया पुरेसे असताना साठेबाजीमुळे तुटवडा निर्माण होतो. पिकांची झटपट वाढ, पिके हिरवेकंच बहरून येत असल्याच्या गुणधर्मामुळे सोबतच अल्पकिंमत असल्यानेच शेतकरी अधिकांश प्रमाणात युरिया घेतात. यंदा खरीप हंगामासाठी ५९,५०० मे.टन युरियाची मागणी नोंदविण्यात आली असून, ४७,०६० मे. टन मंजुरी मिळाली. सध्या जिल्ह्यात १६,११० मे. टन युरिया उपलब्ध आहे. टप्याटप्याने नियमित सप्टेंबरअखेरपर्यंत सर्वच रासायनिक खतांचा पुरवठा होणार आहे. संयुक्त खत म्हणून उपयोगी ठरत असलेल्या एनपीके खतालासुद्धा चांगली मागणी असते. त्यामुळे ५३,९०० मे.टन एनपीकेची मागणी तर ३६,१०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे.

सोयाबीन व कपाशी पिकांवर वापर होणाऱ्या डीएपीची मागणी २९,१०० मे.टन तर त्यापैकी २६,१९० मे.टन मंजुरी मिळाली आहे. मुख्यत: भात पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या एमओपी खतांची ९,८०० मे. टन मागणी होती. पैकी ४,९०० मे.टन मंजुरी मिळाली. सोयाबीन पिकांसाठी वापरण्यात येणारे एसएसपी या दाणेदार खताचाही वापर चांगला होतो. ४१,८०० मे. टन मागणी केल्यानंतर ३०,७३० मे. टन मंजूर करण्यात आले आहे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी कंपोस्ट खताचा वापर केला जातो. फारसा वापर नसल्याने आणि सध्या ४.६० मे. टन साठा उपलब्ध असल्याने यंदा कंपोस्ट खताची मागणी केली गेली नाही. सर्वदूर, समप्रमाणात असा वितरणाचा मूलमंत्र संपूर्ण यंत्रणा राबविणार असून, खत भरपूर आहे. हवे तेवढेच मागा, असे आवाहन केले जात आहे.

विशेष लक्ष राहणार

एकूणच नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ६० हजार मे.टनच्या आसपास रासायनिक खत पुरेसे आहे. कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. फसवणूक, अडवणूक होणार नाही शिवाय युरियाची साठेबाजी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. एक लाख ९४ हजार १०० मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, एक लाख ४४,९८० मे. टन आवंटन मंजूर झाले आहे. १ एप्रिलपासून ८२,४४९ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून खतांची विक्री केवळ ८,३५९ मे.टन तर आजमितीस ७४,०९० मे. टन रासायनिक खते शिल्लक आहे.

-

युरिया पोहोचता झाला

यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत युरियाच्या चार वेगवेगळ्या खेप आल्या. ३० मार्च, १४ आणि १७ एप्रिल तसेच ६ मे रोजी एकूण ७,९५० मे. टन युरिया आला. यामध्ये नर्मदा कंपनीचा १,४०० मे. टन, तर अन्य आरसीएफ कंपनीचा युरिया नागपूरला पोहोचता झाला आहे.

---

बियाणे, खते व औषधांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती न केलेली बरी, असे आम्हास वाटते. शेतकऱ्यांनी शेतीच करू नये. गुलाम बनविण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. वाढीव दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या मोठ्या दरवाढीनंतर थोडे कमी करणे अशी धोकेबाजी शासनाने शेतकऱ्यांसोबत करू नये.

- विलास दरणे, शेतकरी, उदासा, ता. उमरेड