शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

खतटंचाईची नव्हे, दरवाढीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा ...

उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा निकाल लागेल. पाचशे-हजार वाढवायचे व दोन-चारशे रुपये कमी करायचे असे खताबाबत होऊ नये, अशा रोखठोक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत. दरवर्षी खतटंचाईला सामोरे जावे लागते. विशेषत: युरियाच्या बाबतीत हे घडते. असे असले तरी यंदा बळीराजाला खतटंचाईची नव्हे तर दरवाढीची चिंता सतावित आहे. दरवाढ कमी होताच रासायनिक खतांच्या खरेदीवर उड्या पडतील. सध्या नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ९४ हजार १०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात युरियाची समस्या उद‌्भवली होती. एकरी एक ते दीड बॅग युरिया पुरेसे असताना साठेबाजीमुळे तुटवडा निर्माण होतो. पिकांची झटपट वाढ, पिके हिरवेकंच बहरून येत असल्याच्या गुणधर्मामुळे सोबतच अल्पकिंमत असल्यानेच शेतकरी अधिकांश प्रमाणात युरिया घेतात. यंदा खरीप हंगामासाठी ५९,५०० मे.टन युरियाची मागणी नोंदविण्यात आली असून, ४७,०६० मे. टन मंजुरी मिळाली. सध्या जिल्ह्यात १६,११० मे. टन युरिया उपलब्ध आहे. टप्याटप्याने नियमित सप्टेंबरअखेरपर्यंत सर्वच रासायनिक खतांचा पुरवठा होणार आहे. संयुक्त खत म्हणून उपयोगी ठरत असलेल्या एनपीके खतालासुद्धा चांगली मागणी असते. त्यामुळे ५३,९०० मे.टन एनपीकेची मागणी तर ३६,१०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे.

सोयाबीन व कपाशी पिकांवर वापर होणाऱ्या डीएपीची मागणी २९,१०० मे.टन तर त्यापैकी २६,१९० मे.टन मंजुरी मिळाली आहे. मुख्यत: भात पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या एमओपी खतांची ९,८०० मे. टन मागणी होती. पैकी ४,९०० मे.टन मंजुरी मिळाली. सोयाबीन पिकांसाठी वापरण्यात येणारे एसएसपी या दाणेदार खताचाही वापर चांगला होतो. ४१,८०० मे. टन मागणी केल्यानंतर ३०,७३० मे. टन मंजूर करण्यात आले आहे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी कंपोस्ट खताचा वापर केला जातो. फारसा वापर नसल्याने आणि सध्या ४.६० मे. टन साठा उपलब्ध असल्याने यंदा कंपोस्ट खताची मागणी केली गेली नाही. सर्वदूर, समप्रमाणात असा वितरणाचा मूलमंत्र संपूर्ण यंत्रणा राबविणार असून, खत भरपूर आहे. हवे तेवढेच मागा, असे आवाहन केले जात आहे.

विशेष लक्ष राहणार

एकूणच नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ६० हजार मे.टनच्या आसपास रासायनिक खत पुरेसे आहे. कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. फसवणूक, अडवणूक होणार नाही शिवाय युरियाची साठेबाजी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. एक लाख ९४ हजार १०० मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, एक लाख ४४,९८० मे. टन आवंटन मंजूर झाले आहे. १ एप्रिलपासून ८२,४४९ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून खतांची विक्री केवळ ८,३५९ मे.टन तर आजमितीस ७४,०९० मे. टन रासायनिक खते शिल्लक आहे.

-

युरिया पोहोचता झाला

यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत युरियाच्या चार वेगवेगळ्या खेप आल्या. ३० मार्च, १४ आणि १७ एप्रिल तसेच ६ मे रोजी एकूण ७,९५० मे. टन युरिया आला. यामध्ये नर्मदा कंपनीचा १,४०० मे. टन, तर अन्य आरसीएफ कंपनीचा युरिया नागपूरला पोहोचता झाला आहे.

---

बियाणे, खते व औषधांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती न केलेली बरी, असे आम्हास वाटते. शेतकऱ्यांनी शेतीच करू नये. गुलाम बनविण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. वाढीव दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या मोठ्या दरवाढीनंतर थोडे कमी करणे अशी धोकेबाजी शासनाने शेतकऱ्यांसोबत करू नये.

- विलास दरणे, शेतकरी, उदासा, ता. उमरेड