शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

त्रिराज्य संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती

By admin | Updated: April 10, 2016 03:24 IST

सध्या संसदेत राष्ट्रवाद, भाषा आणि वेगळ्या राज्यांच्या बाबतीत चर्चा होत आहेत. अनेक वादप्रवाद यानिमित्ताने होत आहेत.

गंगाधर पानतावणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभनागपूर : सध्या संसदेत राष्ट्रवाद, भाषा आणि वेगळ्या राज्यांच्या बाबतीत चर्चा होत आहेत. अनेक वादप्रवाद यानिमित्ताने होत आहेत. पण या बाबतीत बाबासाहेब हे एकमेव आदर्श आहेत. या संबंधातील बाबासाहेबांची मते समजून घ्यायला कुणीही तयार नाही आणि त्यांच्या नावाचाही उल्लेख होत नाही. लहान राज्यांसाठी बाबासाहेब स्वत: आग्रही होते. महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी त्रिराज्य संकल्पना मांडली होती आणि त्याचे भाग कसे पाडावे, याचीही मते त्यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे तीन राज्य करताना पूर्व, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र अशी तीन राज्य करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले. आंबेडकराईट मुव्हमेन्ट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरतर्फे साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पानतावणे बोलत होते. संस्थेतर्फे याप्रसंगी गंगाधर पानतावणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अशोक गोडघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम, कृष्णा किरवले, प्रकाश खरात, प्रकाश त्रिभुवन, डॉ. महेंद्र भवरे, सुजाता लोखंडे उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ सांस्कृतिक संघाच्या सांस्कृृतिक संकुलातील चौथ्या माळ्यावरील सभागृहात पार पडला. पानतावणे म्हणाले, राष्ट्रभाषा कुठली असावी हा वाद संसदेत झाला तेव्हा प्रत्येकाने संस्कृतपासून आपापल्या मातृभाषेचे महत्त्व समजून सांगितले. त्यावेळी बाबासाहेबांनी मराठीचा पुरस्कार केला पण राष्ट्रभाषा सर्व देशाला जोडणारी असावी. त्यामुळे हिंदीच राष्ट्रभाषा असावी, असा आग्रह धरला होता. बाबासाहेब द्रष्टे होते. ते स्वयंप्रज्ञ होते. आम्हा सर्वांसाठी ते एकमेव आदर्श आहेत. पण आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला इतर तत्त्वज्ञानाचे ठिगळ लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब असल्या अनेक वादळातही स्थिर राहणारे आहेत. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रस्तावना आणि भूमिका संस्थेचे दादाकांत धनविजय यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी तर गंगाधर पानतावणे यांच्या सन्मानपत्राचे वाचन पल्लवी जीवनतारे यांनी केले. याप्रसंगी पानतावणे यांना दहा हजार रुपये रोख, शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. गंगाधर पानतावणे (दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र). हा कार्यक्रमासाठी भूपेश थुलकर, महेंद्र गायकवाड, सुरेश वर्धे, डॉ. सविता कांबळे, राजन वाघमारे, अशोक मेश्राम, गौरव थूल परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)