शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

देशाच्या अखंडतेसाठी राष्ट्रवादाची संकल्पना एक असावी

By admin | Updated: September 30, 2014 00:36 IST

राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे,

मान्यवरांचे मत : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ यावर व्याख्याननागपूर : राष्ट्रवादाची संकल्पना एक असेल तर देशाची एकता, अखंडता टिकून राहते. परंतु भारतात महापुरुषांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना वेगवेगळ्या असून त्यामुळे राष्ट्रवादाची भावना लोप पावत चालली आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी येथे केले.निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार नागपूरच्या वतीने समता सैनिक दलाचे धर्मपाल मून यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी मोरभवनात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत राष्ट्रवाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. रत्नाकर मेश्राम होते. व्यासपीठावर प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. डॉ. वामन गवई, महालेखाकार दिनेश पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना दिनेश पाटील म्हणाले, राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते वापरणारे लोक चांगले असणे गरजेचे आहे, असे आंबेडकरांचे मत होते. भारतातील नागरिक मिळालेले स्वातंत्र्य गमावतील यासाठी बाबासाहेबांनी घटनेतच तरतूद केल्यामुळे हे स्वातंत्र अजूनही अबाधित आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून भारतात लोकशाही होती. परंतु नागरिकांना ती टिकवता आली नाही. त्यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करण्याची गरज आहे. प्रा. डॉ. वामन गवई म्हणाले, गौतम बुद्धांच्या मते मैत्रीभाव म्हणजे राष्ट्रवाद होय. भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना वेगवेगळी आहे. आंबेडकरांच्या मते सर्वसामान्य व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा राष्ट्रवाद होय. आधुनिक काळातील राष्ट्रवादाची संकल्पना विघटनाकडे घेऊन जाणारी आहे. ज्या देशात धर्म राष्ट्रवाद असतो त्या देशात संविधानापेक्षा धर्माचे कायदे श्रेष्ठ ठरतात. राष्ट्रधर्माचे नागरिक प्रथम आणि इतरांना दुय्यम स्थान मिळते. परंतु बाबासाहेबांना कायद्याचे राज्य हवे होते.देशात हिंदू राष्ट्रवाद आल्यास मनुस्मृतीचा कायदा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राहुल दहिकर यांनी केले. संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)