शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक आक्रमक

By admin | Updated: December 19, 2015 02:56 IST

मागील चार दिवसांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यांवर तळ ठोकून बसलेल्या संगणक परिचालकांच्या मागण्यांवर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

चौथ्या दिवशीही रस्त्यावर : मोर्चास्थळी तणावपूर्ण वातावरण नागपूर : मागील चार दिवसांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यांवर तळ ठोकून बसलेल्या संगणक परिचालकांच्या मागण्यांवर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे मोर्चेकरी अधिकच आक्रमक झाले असून, शुक्रवारी दिवसभर मोर्चास्थळी तणावाचे वातावरण होते. गुरुवारी रात्री मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे ओएसडी व ग्रामविकास मंत्र्यांच्या सचिवांशी चर्चा करू न त्यांच्यापुढे भूमिका मांडली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत मागण्यांवर कोणता तरी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु रात्री ९.३० वाजतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेत, सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान संघटनेचा सोलापूर येथील जिल्हाध्यक्ष राहुल पेठकर व माजलगाव येथील सिद्घेश्वर तौर या तरुणांना चक्कर आल्याने ते कोसळले. यामुळे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर लगेच दोन्ही तरुणांना पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दुसरीकडे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सर्व मोर्चेकऱ्यांना रात्रभर रस्त्यावर बसण्याचे आवाहन केले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत सर्व मोर्चेकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर बसले होते.