शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

नवमाध्यमांचा समाजमनावर संमिश्र परिणाम

By admin | Updated: December 8, 2014 00:54 IST

माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे.

मैत्री परिवार संस्था : हेमंत व्याख्यानमाला नागपूर : माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. केवळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या एवढेच ते मर्यादित नसून इंटरनेट, सोशल साईटस् आणि मोबाईल यामुळे माहितीचा स्फोट होतो आहे. यात खाजगी वाहिन्यांना आणि प्रिंट माध्यमांना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मुळात प्रसार माध्यमांचा समाजमनावर परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. सध्या वेगवेगळ्या स्वरूपात येणाऱ्या नवमाध्यमांमुळे समाजमन घुसळून निघते आहे. या नवमाध्यमांचा समाजावर होणारा परिणाम सध्या तरी संमिश्रच आहे, असे मत आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेच्यावतीने हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. यात ‘नवमाध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम’ या विषयावर मंदार फणसे तर ‘बदलत्या राजकीय स्थितीत माध्यमांकडून अपेक्षा’ या विषयावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंदार फणसे म्हणाले, प्रिंट माध्यमांना मात्र स्वत:चे अस्तित्व आहे, ते केव्हाही तपासता येऊ शकते. येणाऱ्या काळात ४ जी आणि ७ जी मुळे माहिती तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे. त्याचा परिणाम समाजमनावर होईलच. त्यामुळे कुठलीही माहिती कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही. अशा स्थितीत माध्यमांना अधिक जबाबदारीने काम करावे लागणार असून, प्रत्यक्ष जनतेशी संवादाची प्रक्रियाही वाढवावी लागणार आहे. येणाऱ्या काळात मोबाईलच्या स्क्रीनवरच सारे जग सामावण्याचे चिन्ह आहे, असे ते म्हणाले. माध्यमांनी विश्वासार्हता गमावू नये : माधव भंडारीमाध्यमांची निर्मितीच समाजमनाला प्रभावित करून निकोप समाजनिर्मितीसाठी झाली आहे. पण तोच उद्देश केवळ व्यावसायिकता पाहताना हरवीत चालला असून, त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता संपत आहे, ही गंभीर बाब आहे. माध्यमांनी जबाबदारीने वृत्त संकलन करून लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. माध्यमांनी आपली विश्वासार्हता गमावू नये, असे मत माधव भंडारी यांनी व्यक्त केले. टीआरपीच्या चक्रात फसण्यापेक्षा आपली बातमीच इतकी पक्की आणि प्रगल्भ असली तर ती नक्कीच विकल्या जाते. प्रसार माध्यमांनी विरोधाचा सूर लावल्यावरही सत्ताबदल झाला. राजकीय पक्षांवर टीका करा, त्यांना चुका दाखवा, पण जनतेला ग्राह्य धरण्याची चूक करू नका, हे या सत्ताबदलाने सिद्ध झाले आहे. समाजाची प्रगल्भता आता माध्यमांनी स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)