शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

समृद्धी महामार्गासाठी महिनाभरात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:17 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून ....

ठळक मुद्देबाळासाहेब कोळेकर : राज्यात सर्वाधिक ३० टक्के काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक ३० टक्के जमीन खरेदीचे काम पूर्ण झाले असून, येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केला.जिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त हिंगणा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात संवाद पर्व आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कोळेकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वºहाडे, तहसीलदार प्रताप वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले.अडीच लाख शेतकºयांना जमीन आरोग्य पत्रिकाकृषी उत्पादन दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना शेत जमिनीसंदर्भात आवश्यक असलेल्या घटक द्रव्यांची माहिती उपलब्ध व्हावी व त्यानुसार पिकांचे नियोजन करता यावे यासाठी शेतकºयांना मृद्र्रा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. जिल्ह्यात अडीच लाख शेतकºयांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.