शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दोन वर्षांत मेट्रो रेल्वेचे ३२ टक्के काम पूर्ण

By admin | Updated: February 19, 2017 02:55 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन शनिवारी हॉटेल सेंटर, रामदासपेठ येथे भव्य समारंभात साजरा करण्यात आला.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन : ८७ टक्के जमीन अधिग्रहित नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन शनिवारी हॉटेल सेंटर, रामदासपेठ येथे भव्य समारंभात साजरा करण्यात आला. या समारंभात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक व सिस्टीम संचालक सुनील माथूर, वित्त संचालक सी. शिवमाथन, कार्यकारी संचालक रामनाथ, वित्त आणि प्रशासन प्रमुख अनिल कोकाटे, उपमहाप्रबंधक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २२ मेट्रो स्थानकांचे बांधकाम सुरू बृजेश दीक्षित म्हणाले, दोन वर्षांपूर्वी नागपूर मेट्रो रेल्वेची सुरुवात एक डीपीआर बुकच्या आधारावर झाली. पूर्वी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आणि आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) असा बदल झाला. लोकांच्या सहकार्याने नागपूर मेट्रो रेल्वेचे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून ३८ पैकी २२ मेट्रोस्थानक आणि ३८ पैकी २२ कि़मी. मेट्रो रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या वेगामुळे हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीचे लोकार्पण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची माहिती लोकांना देण्याच्या उद्देशाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात आलेले माहिती केंद्र अर्थात ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीचे लोकार्पण बृजेश दीक्षित यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ज्योती दीक्षित उपस्थित होत्या. दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पाची माहिती ‘मेट्रो कोच’ या माहिती केंद्रात उपलब्ध राहील.माहिती केंद्र सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळणार आहे. केंद्रात तीन टीव्ही असून ब्रोशर, माहिती फलक, वॉटर कूलर, टेलिफोन आदी सुविधा आहेत. दीक्षित यांनी ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीत एसी कोच प्रवासाचा आनंद अनुभवला. सर्वस्तरातील लोकांना मिळणार सेवा नागपूर मेट्रोकडे लोकांचा ओढा आणि अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. सर्वस्तरातील लोकांना मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. सर्वांधिक भर गुणवत्तेचे बांधकाम आणि सुरक्षेवर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मार्गदर्शन आणि देखरेखीखाली तांत्रिक कार्य सुरू आहे. जूनमध्ये खापरी ते नवीन विमानतळापर्यंत मेट्रो रेल्वेची चाचणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्तविक भाषणात शिरीष आपटे यांनी मेट्रोच्या विकास कार्याची माहिती दिली. यावेळी रायसोनी कॉलेजचे प्रा. विजय कपाई, बाळू राठोड, श्याम पांढरीपांडे आणि इतर मान्यवरांनी मेट्रोची प्रगती आणि जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा केली. समारंभात छत्रपती उड्डाण पुलाच्या तोडकामाचे रेखांकन काढणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तर सत्रात बृजेश दीक्षित यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. रेणुका देशकर यांनी संचालन आणि आभार मानले.