शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: February 15, 2016 03:13 IST

महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी ...

पालकमंत्र्यांसह अधिकारी बेल्यात दाखल : सात हजार नागरिकांना दिलासा बेला : महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक मतदार क्षेत्रात अशा शिबिराचे आयोजन होणार असून ५० लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचणार आहेत, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या शिबिरात सात हजार नागरिकांनी सहभाग नोंदवून समस्या मांडल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. उमरेड तालुक्यातील बेला येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. प्रारंभीपासूनच हजारो नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. या समस्या व तक्रारी सोडविण्यात येतील, असे बोलताना, शासन आपल्या दारात आले आहे. शासनाच्या योजना स्वीकारा आणि लाभ घ्या, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना केले. शिबिराला आ. सुधीर पारवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य जयकुमार वर्मा, आनंद राऊत, शालू मेंढुले, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेरखाने, सरपंच सुभाष तेलरांधे, उपसभापती गोविंद इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, आस्तिक सहारे, श्याम दुबे, तहसीलदार चंद्रभान खंडाईत, गटविकास अधिकारी राठोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी १३ ग्रामपंचायतींमधील लोकांच्या समस्या प्रशासकीय यंत्रणेने जमा करून या शिबिरात ठेवल्या. शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व सीईओ जोंधळे यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. वरिष्ठ अधिकारी जनतेपर्यंत गेले, सामान्यांच्या अडचणींची त्यांना माहिती होईल आणि शासनाच्या योजनाही जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपण स्वत: असे तीन मंत्री जिल्ह्यास लाभले आहेत. विकास कामे करून घेण्यास या संधीचा फायदा घ्यावा. आतापावेतो दोन हजार कोटी रुपये नितीन गडकरींनी जिल्ह्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विविध भागातील १ हजार ७५० विविध प्रमाणपत्र तयार केले असल्याची माहिती दिली. या प्रमाणपत्रांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक टोल फ्री नंबर दिला जाईल. त्यात ७/१२ प्रमाणपत्रे, फेरफार आदीसाठी या टोल नंबरचा उपयोग जनतेला करता येईल. यासाठी नागपुरात येण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)