शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: February 15, 2016 03:13 IST

महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी ...

पालकमंत्र्यांसह अधिकारी बेल्यात दाखल : सात हजार नागरिकांना दिलासा बेला : महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक मतदार क्षेत्रात अशा शिबिराचे आयोजन होणार असून ५० लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचणार आहेत, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या शिबिरात सात हजार नागरिकांनी सहभाग नोंदवून समस्या मांडल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. उमरेड तालुक्यातील बेला येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. प्रारंभीपासूनच हजारो नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. या समस्या व तक्रारी सोडविण्यात येतील, असे बोलताना, शासन आपल्या दारात आले आहे. शासनाच्या योजना स्वीकारा आणि लाभ घ्या, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना केले. शिबिराला आ. सुधीर पारवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य जयकुमार वर्मा, आनंद राऊत, शालू मेंढुले, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेरखाने, सरपंच सुभाष तेलरांधे, उपसभापती गोविंद इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, आस्तिक सहारे, श्याम दुबे, तहसीलदार चंद्रभान खंडाईत, गटविकास अधिकारी राठोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी १३ ग्रामपंचायतींमधील लोकांच्या समस्या प्रशासकीय यंत्रणेने जमा करून या शिबिरात ठेवल्या. शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व सीईओ जोंधळे यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. वरिष्ठ अधिकारी जनतेपर्यंत गेले, सामान्यांच्या अडचणींची त्यांना माहिती होईल आणि शासनाच्या योजनाही जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपण स्वत: असे तीन मंत्री जिल्ह्यास लाभले आहेत. विकास कामे करून घेण्यास या संधीचा फायदा घ्यावा. आतापावेतो दोन हजार कोटी रुपये नितीन गडकरींनी जिल्ह्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विविध भागातील १ हजार ७५० विविध प्रमाणपत्र तयार केले असल्याची माहिती दिली. या प्रमाणपत्रांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक टोल फ्री नंबर दिला जाईल. त्यात ७/१२ प्रमाणपत्रे, फेरफार आदीसाठी या टोल नंबरचा उपयोग जनतेला करता येईल. यासाठी नागपुरात येण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)