शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उपराजधानीतील बँकांविरोधात तक्रारी वाढल्या; माहितीच्या अधिकारात झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:39 IST

२०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१४ महिन्यांत दीड लाखांहून अधिक तक्रारी सेवांमधील त्रुटीसाठी ‘आरबीआय’ लोकपालाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर सामान्य नागरिक तक्रारी वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही असा सर्वसाधारण समज आहे. परंतु २०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. २०१६ च्या तुलनेत तक्रारींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे हे विशेष. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बँकांच्या कार्यप्रणाली व सेवेवर नाराज असलेल्या किती नागरिकांनी रिझर्व्ह बँकेकडे दाद मागितली, कुठल्या बँकेविरोधात सर्वात जास्त तक्रारी आहे, यासंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत विविध बँकांविरोधात बँक लोकपाल कार्यालयात १ लाख ७३ हजार १७० तक्रारी प्राप्त झाल्या. यात देशातील विविध राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश आहे. देशभरातील २०३ बँकाविरोधात या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

१ ते २६ हजार तक्रारींचा समावेशमाहितीच्या अधिकारात मिळालेल्या या माहितीनुसार, बँकांवर नाराज असलेल्या ग्राहकांनी सर्वच प्रकारच्या बँकांविरोधात ‘रिझर्व्ह बँकेच्या लोकपाल’कडे तक्रारी केल्या आहेत. यात अगदी एक तक्रार असलेली बँक आहे अन् २५ हजारांहून अधिक तक्रार असलेल्या बँकेचादेखील समावेश आहे. १००० किंवा त्याहून कमी तक्रारी असलेल्या १७५ बँक, १ हजार ते ५ हजार तक्रारी असलेल्या १८ तर ५ हजारांहून अधिक तक्रारी असलेल्या १० बँकांचा या यादीत समावेश आहे.

नागपुरातील दोन बँकांचा समावेशदरम्यान, या तक्रारीच्या यादींमध्ये नागपुरातील दोन बँकांचादेखील समावेश आहे. सहकारी बँक गटातील या बँकांविरोधात ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे अनुक्रमे ५ व ८ तक्रारी झालेल्या आहेत.

‘केवायसी’ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई नाही१४ महिन्यांच्या कालावधीत ‘रिझर्व्ह बँके’ला ‘केवायसी’ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ राज्य सहकारी व ३४ जिल्हा सहकारी बँका आढळून आल्या. परंतु या बँकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई झालेली नाही.

राज्य सहकारी बँकांचे ‘एनपीए’ नऊ लाख कोटींजवळदरम्यान, ३१ डिसेंबर २०१७ च्या आकडेवारीनुसार राज्य सहकारी बँकांचा ‘एनपीए’चा आकडा ८,९९,६५९ कोटी इतका होता. तर सर्व अर्बन सहकारी बँकांचा ‘एनपीए’ची आकडेवारी २१,२९७ कोटी ८३ लाख इतकी होती.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र