शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

६०० वर नागरिकांनी मांडल्या तक्रारी

By admin | Updated: September 7, 2015 03:03 IST

कोराडी येथे रविवारी आयोजित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात तब्बल ६०० वर नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर केल्या.

कोराडी जनता दरबार : पालकमंत्र्यांनी सलग सहा तास ऐकून घेतल्या अडचणी नागपूर : कोराडी येथे रविवारी आयोजित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात तब्बल ६०० वर नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. सलग सहा तास चाललेल्या या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी सर्व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत निवेदन स्वीकारले. तसेच प्रत्येकाच्या अर्जावर विविध कारवाईदर्शक सूचना लिहिल्या. तर काही प्रकरणात अधिकाऱ्यांना कामे करण्याचे थेट निर्देश दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून कोराडीत जनता दरबार घेत आहेत. मंत्री झाल्यानंतरही त्यांचा हा जनता दरबार नियमितपणे सुरू आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ ही जनता दरबाराची वेळ होती. परंतु दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांचे येणे सुरूच होते. सहा तास सलग चाललेल्या या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी प्रत्येकाची तक्रार काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्याच्या अर्जावर कारवाईबाबत सूचना लिहून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. काही जणांची कामे तातडीने होण्यासारखी असल्यास ती त्यांनी तेव्हाच करण्याचे निर्देश दिले. जे काम होऊच शकत नाही, अशांना पोकळ आश्वासन न देता त्यांना स्पष्टपणे काम होत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)