शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

By admin | Updated: May 29, 2017 03:03 IST

मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत

मालमत्तेसाठी छळ : आरोपींची पोलिसांकडून पाठराखण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत जगणाऱ्या एका निराधार महिलेने न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तृप्ती अजय कोथरे (वय ३३) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती जरीपटक्यातील दयाल सोसायटीत राहते.तृप्तीच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. मिळेल तो कामधंदा करून ती स्वत:चा आणि मुलांचा उदरनिर्वाह करते. तृप्तींच्या सासऱ्यांची शेतजमीन होती. त्यांनी ती विकली आणि त्यातून आलेल्या रकमेचा आपल्या वारसांना हिस्सावाटप केले. हिस्सेवाटणीतून मिळालेल्या पैशातून अजय कोथरेंनी (तृप्तीचे पती) दयालनगर सोसायटीत घर बांधले. अजयचा मृत्यू झाल्यानंतर तृप्ती आणि तिच्या मुलांना या घरातून हुसकावून लावण्यासाठी आरोपी संदीप कोथरे (दीर) आणि रवी तायडे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तृप्ती व तिच्या मुलांचा छळ चालविला आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी संदीप कोथरे, रवी तायडे आणि त्यांच्या साथीदारांनी तृप्ती व तिच्या मुलांवर हल्ला चढवला. तृप्तीच्या घराचे दार तोडून साहित्याची तोडफोड केली. तिला व मुलांना बेदम मारहाण करून तृप्तीसोबत लज्जास्पद व्यवहार केला. या घटनेची तक्रार तृप्तीने जरीपटका ठाण्यात दिली. प्रारंभी जरीपटका पोलिसांनी कारवाईसाठी मोठा जोश दाखवला. नंतर मात्र आरोपींची पाठराखण करून ‘नातेवाईकांचा आपसी वाद’अशी नोंद करीत तृप्तीची तक्रार अदखलपात्र (एनसी) केली. पोलिसांची साथ मिळाल्याने आरोपींकडून तृप्तीचा छळ वाढला आहे. तिच्या लहान मुलांनाही ते धमकावत आहेत. यामुळे तृप्ती व तिची मुले १० दिवसांपासून दहशतीत जगत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची आयुक्तालयात तशी तक्रार दिली असून, न्यायाची अपेक्षा केली आहे.आरोपी गुन्हेगारीवृत्तीचाविशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी रवी तायडे हा गुन्हेगारीवृत्तीचा असून, त्याने गेल्या आठवड्यात यशोधरानगरातील वाहतूक व्यावसायिकावर आपल्या गुंडांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता.