शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

By admin | Updated: May 29, 2017 03:03 IST

मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत

मालमत्तेसाठी छळ : आरोपींची पोलिसांकडून पाठराखण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत जगणाऱ्या एका निराधार महिलेने न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तृप्ती अजय कोथरे (वय ३३) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती जरीपटक्यातील दयाल सोसायटीत राहते.तृप्तीच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. मिळेल तो कामधंदा करून ती स्वत:चा आणि मुलांचा उदरनिर्वाह करते. तृप्तींच्या सासऱ्यांची शेतजमीन होती. त्यांनी ती विकली आणि त्यातून आलेल्या रकमेचा आपल्या वारसांना हिस्सावाटप केले. हिस्सेवाटणीतून मिळालेल्या पैशातून अजय कोथरेंनी (तृप्तीचे पती) दयालनगर सोसायटीत घर बांधले. अजयचा मृत्यू झाल्यानंतर तृप्ती आणि तिच्या मुलांना या घरातून हुसकावून लावण्यासाठी आरोपी संदीप कोथरे (दीर) आणि रवी तायडे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तृप्ती व तिच्या मुलांचा छळ चालविला आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी संदीप कोथरे, रवी तायडे आणि त्यांच्या साथीदारांनी तृप्ती व तिच्या मुलांवर हल्ला चढवला. तृप्तीच्या घराचे दार तोडून साहित्याची तोडफोड केली. तिला व मुलांना बेदम मारहाण करून तृप्तीसोबत लज्जास्पद व्यवहार केला. या घटनेची तक्रार तृप्तीने जरीपटका ठाण्यात दिली. प्रारंभी जरीपटका पोलिसांनी कारवाईसाठी मोठा जोश दाखवला. नंतर मात्र आरोपींची पाठराखण करून ‘नातेवाईकांचा आपसी वाद’अशी नोंद करीत तृप्तीची तक्रार अदखलपात्र (एनसी) केली. पोलिसांची साथ मिळाल्याने आरोपींकडून तृप्तीचा छळ वाढला आहे. तिच्या लहान मुलांनाही ते धमकावत आहेत. यामुळे तृप्ती व तिची मुले १० दिवसांपासून दहशतीत जगत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची आयुक्तालयात तशी तक्रार दिली असून, न्यायाची अपेक्षा केली आहे.आरोपी गुन्हेगारीवृत्तीचाविशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी रवी तायडे हा गुन्हेगारीवृत्तीचा असून, त्याने गेल्या आठवड्यात यशोधरानगरातील वाहतूक व्यावसायिकावर आपल्या गुंडांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता.