शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

By admin | Updated: May 29, 2017 03:03 IST

मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत

मालमत्तेसाठी छळ : आरोपींची पोलिसांकडून पाठराखण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत जगणाऱ्या एका निराधार महिलेने न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तृप्ती अजय कोथरे (वय ३३) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती जरीपटक्यातील दयाल सोसायटीत राहते.तृप्तीच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. मिळेल तो कामधंदा करून ती स्वत:चा आणि मुलांचा उदरनिर्वाह करते. तृप्तींच्या सासऱ्यांची शेतजमीन होती. त्यांनी ती विकली आणि त्यातून आलेल्या रकमेचा आपल्या वारसांना हिस्सावाटप केले. हिस्सेवाटणीतून मिळालेल्या पैशातून अजय कोथरेंनी (तृप्तीचे पती) दयालनगर सोसायटीत घर बांधले. अजयचा मृत्यू झाल्यानंतर तृप्ती आणि तिच्या मुलांना या घरातून हुसकावून लावण्यासाठी आरोपी संदीप कोथरे (दीर) आणि रवी तायडे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तृप्ती व तिच्या मुलांचा छळ चालविला आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी संदीप कोथरे, रवी तायडे आणि त्यांच्या साथीदारांनी तृप्ती व तिच्या मुलांवर हल्ला चढवला. तृप्तीच्या घराचे दार तोडून साहित्याची तोडफोड केली. तिला व मुलांना बेदम मारहाण करून तृप्तीसोबत लज्जास्पद व्यवहार केला. या घटनेची तक्रार तृप्तीने जरीपटका ठाण्यात दिली. प्रारंभी जरीपटका पोलिसांनी कारवाईसाठी मोठा जोश दाखवला. नंतर मात्र आरोपींची पाठराखण करून ‘नातेवाईकांचा आपसी वाद’अशी नोंद करीत तृप्तीची तक्रार अदखलपात्र (एनसी) केली. पोलिसांची साथ मिळाल्याने आरोपींकडून तृप्तीचा छळ वाढला आहे. तिच्या लहान मुलांनाही ते धमकावत आहेत. यामुळे तृप्ती व तिची मुले १० दिवसांपासून दहशतीत जगत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची आयुक्तालयात तशी तक्रार दिली असून, न्यायाची अपेक्षा केली आहे.आरोपी गुन्हेगारीवृत्तीचाविशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी रवी तायडे हा गुन्हेगारीवृत्तीचा असून, त्याने गेल्या आठवड्यात यशोधरानगरातील वाहतूक व्यावसायिकावर आपल्या गुंडांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता.