शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

स्पर्धा नको समन्वय हवा

By admin | Updated: October 17, 2015 03:20 IST

क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.

‘लोकमत’ व्यासपीठ : विविध क्षेत्रातील महिलांनी व्यक्त केले मतनागपूर : क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. महिलांनी स्वत:ला विविध क्षेत्रात सिद्ध केले असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि दुय्यमच आहे. महिलांच्या बाबतीत चांगली-वाईट संमिश्रता आहे. वैचारिकदृष्ट्या सुशिक्षित महिलाही स्वतंत्र झालेल्या नाहीत. पत्नी यशस्वी झालेली हवी आहे पण ती स्वत:पेक्षा समोर गेलेली मात्र चालत नाही. यासाठी समाजाची मानसिकताच बदलणे गरजेचे आहे. स्पर्धा नव्हे स्त्री-पुरूषांमधला समन्वय विकसित होण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी शुक्रवारी व्यक्त केले. नवरात्रौत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत सामाजिक क्षेत्रातील महिलांनी स्त्रीविश्वाचा वेध, बदलते स्वरूप आणि आव्हाने या विषयांवर विचारमंथन केले. (प्रतिनिधी)स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करीत आहेत. त्यांच्यात काही करण्याची क्षमता आहे आणि इच्छाही पण त्यांना संधी मिळत नाही. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी प्रामुख्याने आई महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मुलांना वाढवितानाच त्यांच्यावर समानतेचा संस्कार केला तर पुरुषी मानसिकतेच्या प्रश्नामुळे स्त्रियांचे होणारे नुकसान सावरता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक आई सक्षम झाली पाहिजे. -डॉ. सरिता मोवाडे एस.एस. टेक्नोव्हिजन अँड इकोसोल्युशन महिलांच्या शक्तीबद्दल समाजात बोलले जाते पण त्यांना स्थान मात्र दुय्यमच दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीत तफावत आहेच. स्त्री सुशिक्षित असली तरी निर्णयक्षमतेचा अधिकार तिला नाही. पत्नी तिच्या क्षेत्रात यशस्वी असावी पण स्वत:पेक्षा समोर गेलेली आवडत नाही. समाजाला त्यासाठी वैचारिक बैठकच बदलावी लागेल. पालकांनी मुलांना समृद्ध करताना हा संस्कार बालपणापासून दिला तर समाजही बदलेल. - डॉ. सीमा दंदेप्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञप्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करुन ती एखादा उद्योग उभारु शकते आणि आर्थिक बाबतीत सक्षम होऊ शकते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच तिच्या प्रगतीत बाधा येतात पण तिला व्यवसाय करण्याची संधी नाकारली जाते. त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा सुशिक्षित स्त्रियांनाही नोकरी करण्यापासून मज्जाव केला जातो. हे थांबले पाहिजे. -वंदना शर्मा, व्हीआयएच्या महिला विभाग अध्यक्षमहिलांच्या बाबतीत विचार करताना ग्रामीण आणि शहरी स्त्रीचा वेगवेगळा विचार करावा लागेल. ग्रामीण भागात महिला स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसतात. पण अद्यापही काही निर्णय घेताना महिलांमध्ये विश्वास नसतो. काही निर्णय पुरुषांनीच घ्यावे, असे तिला वाटते. या स्थितीत बदल होत आहे आणि भविष्यात महिलाच वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्यांत आणि शिक्षणात मुलींचा टक्का वाढतो आहे. स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा व्यक्ती म्हणून आपली दृष्टी विकसित केली पाहिजे. - ज्योती पाटील, प्राचार्या रेणुका महाविद्यालय