शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा नको समन्वय हवा

By admin | Updated: October 17, 2015 03:20 IST

क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.

‘लोकमत’ व्यासपीठ : विविध क्षेत्रातील महिलांनी व्यक्त केले मतनागपूर : क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. महिलांनी स्वत:ला विविध क्षेत्रात सिद्ध केले असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि दुय्यमच आहे. महिलांच्या बाबतीत चांगली-वाईट संमिश्रता आहे. वैचारिकदृष्ट्या सुशिक्षित महिलाही स्वतंत्र झालेल्या नाहीत. पत्नी यशस्वी झालेली हवी आहे पण ती स्वत:पेक्षा समोर गेलेली मात्र चालत नाही. यासाठी समाजाची मानसिकताच बदलणे गरजेचे आहे. स्पर्धा नव्हे स्त्री-पुरूषांमधला समन्वय विकसित होण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी शुक्रवारी व्यक्त केले. नवरात्रौत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत सामाजिक क्षेत्रातील महिलांनी स्त्रीविश्वाचा वेध, बदलते स्वरूप आणि आव्हाने या विषयांवर विचारमंथन केले. (प्रतिनिधी)स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करीत आहेत. त्यांच्यात काही करण्याची क्षमता आहे आणि इच्छाही पण त्यांना संधी मिळत नाही. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी प्रामुख्याने आई महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मुलांना वाढवितानाच त्यांच्यावर समानतेचा संस्कार केला तर पुरुषी मानसिकतेच्या प्रश्नामुळे स्त्रियांचे होणारे नुकसान सावरता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक आई सक्षम झाली पाहिजे. -डॉ. सरिता मोवाडे एस.एस. टेक्नोव्हिजन अँड इकोसोल्युशन महिलांच्या शक्तीबद्दल समाजात बोलले जाते पण त्यांना स्थान मात्र दुय्यमच दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीत तफावत आहेच. स्त्री सुशिक्षित असली तरी निर्णयक्षमतेचा अधिकार तिला नाही. पत्नी तिच्या क्षेत्रात यशस्वी असावी पण स्वत:पेक्षा समोर गेलेली आवडत नाही. समाजाला त्यासाठी वैचारिक बैठकच बदलावी लागेल. पालकांनी मुलांना समृद्ध करताना हा संस्कार बालपणापासून दिला तर समाजही बदलेल. - डॉ. सीमा दंदेप्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञप्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करुन ती एखादा उद्योग उभारु शकते आणि आर्थिक बाबतीत सक्षम होऊ शकते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच तिच्या प्रगतीत बाधा येतात पण तिला व्यवसाय करण्याची संधी नाकारली जाते. त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा सुशिक्षित स्त्रियांनाही नोकरी करण्यापासून मज्जाव केला जातो. हे थांबले पाहिजे. -वंदना शर्मा, व्हीआयएच्या महिला विभाग अध्यक्षमहिलांच्या बाबतीत विचार करताना ग्रामीण आणि शहरी स्त्रीचा वेगवेगळा विचार करावा लागेल. ग्रामीण भागात महिला स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसतात. पण अद्यापही काही निर्णय घेताना महिलांमध्ये विश्वास नसतो. काही निर्णय पुरुषांनीच घ्यावे, असे तिला वाटते. या स्थितीत बदल होत आहे आणि भविष्यात महिलाच वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्यांत आणि शिक्षणात मुलींचा टक्का वाढतो आहे. स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा व्यक्ती म्हणून आपली दृष्टी विकसित केली पाहिजे. - ज्योती पाटील, प्राचार्या रेणुका महाविद्यालय