शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा असला तरी भरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:32 IST

रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशाच्या वारसदारांना आठ लाख रुपये मंजूर

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. हा निर्णय रेल्वे अपघात पीडितांसाठी उपयोगी सिद्ध होणार आहे.फिरदौस कौसर या ४ फेब्रुवारी २०१० रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुरातील अजनी येथून बडनेराला जात होत्या. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे रेल्वेचे अधिकृत तिकीट होते. त्यामुळे वारसदार अब्दुल रशीद व परवीन बानो यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने ४ आॅगस्ट २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. फिरदौस कौसर या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे रेल्वेतून खाली पडल्या. परिणामी, भरपाई देता येणार नाही असे या वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले. त्याविरुद्ध वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे भूमिका मांडून वारसदारांना चार महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मध्य रेल्वेला दिला.

ही फौजदारी कृती नव्हेरेल्वे प्रवाशाने निष्काळजीपणा करणे ही फौजदारी कृती नव्हे. त्यामुळे निष्काळजीपणाच्या कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही. प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना किंवा रेल्वेत चढताना खाली पडणे ही दुर्दैवी घटना आहे. करिता वारसदार भरपाईस पात्र ठरतात असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय