शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

निष्काळजीपणा असला तरी भरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:32 IST

रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशाच्या वारसदारांना आठ लाख रुपये मंजूर

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. हा निर्णय रेल्वे अपघात पीडितांसाठी उपयोगी सिद्ध होणार आहे.फिरदौस कौसर या ४ फेब्रुवारी २०१० रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुरातील अजनी येथून बडनेराला जात होत्या. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे रेल्वेचे अधिकृत तिकीट होते. त्यामुळे वारसदार अब्दुल रशीद व परवीन बानो यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने ४ आॅगस्ट २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. फिरदौस कौसर या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे रेल्वेतून खाली पडल्या. परिणामी, भरपाई देता येणार नाही असे या वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले. त्याविरुद्ध वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे भूमिका मांडून वारसदारांना चार महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मध्य रेल्वेला दिला.

ही फौजदारी कृती नव्हेरेल्वे प्रवाशाने निष्काळजीपणा करणे ही फौजदारी कृती नव्हे. त्यामुळे निष्काळजीपणाच्या कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही. प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना किंवा रेल्वेत चढताना खाली पडणे ही दुर्दैवी घटना आहे. करिता वारसदार भरपाईस पात्र ठरतात असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय