शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

निष्काळजीपणा असला तरी भरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:32 IST

रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशाच्या वारसदारांना आठ लाख रुपये मंजूर

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. हा निर्णय रेल्वे अपघात पीडितांसाठी उपयोगी सिद्ध होणार आहे.फिरदौस कौसर या ४ फेब्रुवारी २०१० रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुरातील अजनी येथून बडनेराला जात होत्या. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे रेल्वेचे अधिकृत तिकीट होते. त्यामुळे वारसदार अब्दुल रशीद व परवीन बानो यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने ४ आॅगस्ट २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. फिरदौस कौसर या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे रेल्वेतून खाली पडल्या. परिणामी, भरपाई देता येणार नाही असे या वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले. त्याविरुद्ध वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे भूमिका मांडून वारसदारांना चार महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मध्य रेल्वेला दिला.

ही फौजदारी कृती नव्हेरेल्वे प्रवाशाने निष्काळजीपणा करणे ही फौजदारी कृती नव्हे. त्यामुळे निष्काळजीपणाच्या कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही. प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना किंवा रेल्वेत चढताना खाली पडणे ही दुर्दैवी घटना आहे. करिता वारसदार भरपाईस पात्र ठरतात असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय