शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ममता देते सुरक्षाकवच

By admin | Updated: October 22, 2015 04:31 IST

समाजात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना लक्षात घेता महिला असुरक्षित असल्याची भावना आहे. त्या हतबल

नागपूर : समाजात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना लक्षात घेता महिला असुरक्षित असल्याची भावना आहे. त्या हतबल असून, त्यांनाच सुरक्षा पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वातावरणात नागपुरातील ममता राजेश गिरीपुंजे या महिलेने समाजाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी एक आव्हान म्हणून स्वीकारली आहे. यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत त्या यशस्वीपणे सुरक्षिततेचे कवच प्रदान करीत आहेत.आयुष्यातील काही प्रसंग असे घडतात, त्यातून मार्ग काढणे फार कठीण होऊन जाते. अशा प्रसंगात तर काही महिला हतबल होऊन, आयुष्य संपविण्याचे धाडस करतात. परंतु काही महिला अशा प्रसंगांना धाडसाने सामोर जाऊन, त्यावर मात करून विजयश्री मिळवितात. यापैकीच एक आहे ममता गिरीपुंजे. ममताच्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी अतिशय दु:खद प्रसंग घडला. त्यांच्या पतीचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. डोंगराएवढे संकट त्यांच्यापुढे उभे राहिले. निराश, हतबल झालेल्या ममताच्या आयुष्याचा पुढचा प्रवासच थांबला. उच्चशिक्षित असतानाही सर्वस्व हरविल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. हळूहळू दिवस पुढे जात होते. दु:ख ओसरू लागले होते. मुलाचा चेहरा बघून मन खंबीर होत होते. सासू-सासऱ्यांनीही धीर दिला, आप्तस्वकियांनी पाठबळ दिले. ममता यांचे पतीची सुरक्षा एजन्सी चालवायचे. १८ ते २० सुरक्षा रक्षक त्यांच्या एजन्सीत कार्यरत होते. पतीच्या निधनामुळे सुरक्षा एजन्सीचे काम ठप्प पडले होते. ममता यांनी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा सुरक्षा एजन्सीचे कार्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या पाठबळामुळे पुरुषांच्या व्यवसायात तिने पदार्पण केले. ज्या संस्थेला त्यांची एजन्सी सुरक्षा प्रदान करायची. त्या संस्थेच्या मॅनेजरने सुरुवातीला थोडा नकारात्मक सूर आवळला. मात्र ममता यांनी एक संधी त्यांना मागितली. ही संधी मिळाल्यानंतर सुरक्षा पुरविण्याचे काम त्यांनी नेहमीप्रमाणे सुरू केले. ममताच्या संचालनात गेल्या दीड ते दोन वर्षात अशी कुठलीही तक्रार संस्थेला आली नाही. पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने एजन्सीचे काम होत असल्याची पावती ममताला मिळाली. सुरक्षा एजन्सी सांभाळण्याचे काम फार सोपे नाही. महिलांना तर ही जबाबदारी सांभाळणे अवघडच. सुरक्षा रक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन काम करावे लागले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना काहीसे कठोरही व्हावे लागले. त्यानुसार आपल्या स्वभावातही परिवर्तन केले. गार्डची ड्युटी लावणे, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीबेरात्री भेटी देणे, संस्थाचालकाच्या अडचणी समजावून घेणे ही कामे करावी लागतात. शब्दांकन : मंगेश व्यवहारे