शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ममता देते सुरक्षाकवच

By admin | Updated: October 22, 2015 04:31 IST

समाजात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना लक्षात घेता महिला असुरक्षित असल्याची भावना आहे. त्या हतबल

नागपूर : समाजात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना लक्षात घेता महिला असुरक्षित असल्याची भावना आहे. त्या हतबल असून, त्यांनाच सुरक्षा पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वातावरणात नागपुरातील ममता राजेश गिरीपुंजे या महिलेने समाजाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी एक आव्हान म्हणून स्वीकारली आहे. यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत त्या यशस्वीपणे सुरक्षिततेचे कवच प्रदान करीत आहेत.आयुष्यातील काही प्रसंग असे घडतात, त्यातून मार्ग काढणे फार कठीण होऊन जाते. अशा प्रसंगात तर काही महिला हतबल होऊन, आयुष्य संपविण्याचे धाडस करतात. परंतु काही महिला अशा प्रसंगांना धाडसाने सामोर जाऊन, त्यावर मात करून विजयश्री मिळवितात. यापैकीच एक आहे ममता गिरीपुंजे. ममताच्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी अतिशय दु:खद प्रसंग घडला. त्यांच्या पतीचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. डोंगराएवढे संकट त्यांच्यापुढे उभे राहिले. निराश, हतबल झालेल्या ममताच्या आयुष्याचा पुढचा प्रवासच थांबला. उच्चशिक्षित असतानाही सर्वस्व हरविल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. हळूहळू दिवस पुढे जात होते. दु:ख ओसरू लागले होते. मुलाचा चेहरा बघून मन खंबीर होत होते. सासू-सासऱ्यांनीही धीर दिला, आप्तस्वकियांनी पाठबळ दिले. ममता यांचे पतीची सुरक्षा एजन्सी चालवायचे. १८ ते २० सुरक्षा रक्षक त्यांच्या एजन्सीत कार्यरत होते. पतीच्या निधनामुळे सुरक्षा एजन्सीचे काम ठप्प पडले होते. ममता यांनी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा सुरक्षा एजन्सीचे कार्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या पाठबळामुळे पुरुषांच्या व्यवसायात तिने पदार्पण केले. ज्या संस्थेला त्यांची एजन्सी सुरक्षा प्रदान करायची. त्या संस्थेच्या मॅनेजरने सुरुवातीला थोडा नकारात्मक सूर आवळला. मात्र ममता यांनी एक संधी त्यांना मागितली. ही संधी मिळाल्यानंतर सुरक्षा पुरविण्याचे काम त्यांनी नेहमीप्रमाणे सुरू केले. ममताच्या संचालनात गेल्या दीड ते दोन वर्षात अशी कुठलीही तक्रार संस्थेला आली नाही. पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने एजन्सीचे काम होत असल्याची पावती ममताला मिळाली. सुरक्षा एजन्सी सांभाळण्याचे काम फार सोपे नाही. महिलांना तर ही जबाबदारी सांभाळणे अवघडच. सुरक्षा रक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन काम करावे लागले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना काहीसे कठोरही व्हावे लागले. त्यानुसार आपल्या स्वभावातही परिवर्तन केले. गार्डची ड्युटी लावणे, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीबेरात्री भेटी देणे, संस्थाचालकाच्या अडचणी समजावून घेणे ही कामे करावी लागतात. शब्दांकन : मंगेश व्यवहारे