शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

श्रमाच्या समिधा अन् रस्त्याचा यज्ञ

By admin | Updated: August 24, 2015 02:41 IST

मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते.

आदर्श कार्य : सेवानिवृत्त फुलझेलेंचा विधायक पुढाकारलोकमत प्रेरणावाटनागपूर : मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते. एम.पी. फुलझेले त्यातलेच एक़ सेवानिवृत्त फुलझेले हे मूळचे नागपूरचेच असून ते सध्या दिल्लीत राहतात. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे. त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिली पायीसुद्धा जाणे कठीण होते. हे चित्र बदलण्यासाठी फुलझेले यांनी पुढाकार घेतला आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कच्चा पुलाच्या जागी पक्का पूल तयार झाला. गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला.नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असले तरी नागपूरच्या सभोवतालच्या गावांची परिस्थिती अजूनही दयनीय अशीच आहे. नागपूरपासून २० कि.मी. अंतरावर पारशिवनी तालुक्यातील ताडसा ते मौदा या रोडवर निरज खंडारा (घटाटे ) हे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून जवळपास तीन किलोमीटर आत हे गाव आहे. फुलझेले हे केंद्रीय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. एस.एस.टी. अधिकाऱ्यांना ते विविध योजनांविषयी मार्गदर्शन करीत असतात. या गावात फुलझेले यांनी एक शेत घेतले असून त्यात त्यांनी ट्रेनिंग सेटर उभारले आहेत. यासाठी त्यांचे नागपुरात येणे-जाणे असते. २००७ सालची ही गोष्ट आहे. मुख्य रस्त्यापासून आत गावाला जाणारा रस्ता हा केवळ मातीचाच होता. रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर तीन-चार पाईप टाकून पूल तयार करण्यात आला होता. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे. त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिलीच पायीसुद्धा जाणे कठीण होते. पावसाळ्यात या गावाचा संपर्क इतरांशी नाहीच्या बरोबरच राहत असे. त्याच दरम्यान फुलझेले यांचे या गावात येणे झाले. त्यांनाही या रस्त्यामुळे मोठी अडचण होऊ लागली. केंद्र शासनात वरिष्ठ अधिकारी राहिल्यामुळे त्यानी शासन दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गावातील वरिष्ठ व ज्येष्ठ मान्यवर नागरिकांना जागृत केले. गावकऱ्यांचीही त्यांना साथ मिळाली. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. नाव ग्राम पंचायतीचे राहत असे आणि पत्रव्यवहार स्वत: फुलझेले करायचे. यात दोन चार वर्षे उलटली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मौद्यात एनटीपीसीचा मोठा प्रकल्प आहे. त्यांच्या सीएसआर निधीतून गावकऱ्यांना रस्त्यासाठी मदत होऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आली. याचदरम्यान त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सुद्धा काही एनटीपीसीचे अधिकारी सहभागी झाल्याने त्यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यातून सीएसआर ही योजना गावकऱ्यांना समजावून सांगितली. मोठमोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी काही निधी खर्च करावा लागतो. आपल्या क्षेत्रात एनटीपीसी सारखा मोठा प्रकल्प आहे. त्यांना आपण रस्ता बांधणीसाठी मदत करण्याची विनंती करण्याचे आवाहन केले. ग्राम पंचायतीसह गावकऱ्यांनाही त्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर फुलझेले यांनी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनाही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना ही बिकट समस्या लक्षात आली. त्यांनी लगेच सर्व्हे केला आणि कामाला सुरुवात झाली. अवघ्या महिनाभरात गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला. (प्रतिनिधी)