शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन सरकारची जनतेत तुलना करा

By admin | Updated: November 1, 2015 03:11 IST

वर्षभरात कोणत्याही सरकारचे मूल्यमापन करू शकत नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार १५ वर्षात जी कामे करू शकले नाही, ...

रावसाहेब दानवे यांचे आवाहन : राज्य सरकारची वर्षपूर्तीनागपूर : वर्षभरात कोणत्याही सरकारचे मूल्यमापन करू शकत नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार १५ वर्षात जी कामे करू शकले नाही, त्या कामांना भाजपप्रणित राज्य सरकारने गेल्या वर्षभरात सुरुवात केली आहे. अनेक प्रश्न निकाली काढले आहे. एखादे सरकार पडते तेव्हा आपण केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडलो, अशी खंत व्यक्त केली जाते. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून भाजप सरकारने वर्षभरात घेतलेले निर्णय जनतेत घेऊन जा व दोन सरकारमध्ये जनतेत तुलना करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त नागपूर शहर व ग्रामीण भाजपतर्फे शनिवारी गांधीसागर परिसरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात लोकसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून खा. दानवे यांनी राज्य सरकारने वर्षभरात घेतलेल्या निर्णयाचा पाढा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वाचला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. सुधाकरराव देशमुख, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी आ. अशोक मानकर उपस्थित होते.दानवे म्हणाले, गेल्या सरकारने २४ दलघमी पाणी अडविण्यासाठी ७ हजार कोटी रुपये खर्च केले. भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तेवढेच पाणी फक्त ९०० कोटींत अडवले. पूर्वी ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी आली तरच दुष्काळ ग्राह्य धरला जायचा. आम्ही ३३ टक्के पैसेवारीचा निर्णय घेतला व नुकसान भरपाईपोटी किमान एक हजार रुपयांच्या खालचे चेक द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना झिरो बॅलेन्सवर बँकेत खाते उघडून दिले. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज मिळत नव्हती. आम्ही मागेल त्याला कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर राज्य सरकारने विकत घेतले. तेथेही स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दुसरीकडे काँग्रेसने मात्र या मागण्या प्रलंबित ठेवल्या. तसेच भंडारा, मुंबईत बाबासाहेबांना लोकसभा निवडणुकीत हरविण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मात्र, आम्ही लवकरच कामाला सुरुवात करणार असून पंतप्रधान त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईत येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिवाळी अधिवेशनापूर्वी  जिल्हा बँक सुरू होणारजिल्हा बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे बँक डबघाईस येऊन बंद पडली. मात्र, शेतकऱ्यांचे हित विचारात घेता ही बँक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी जिल्हा बँक सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. घोटाळेबाजांवर कायद्यानुसार कारवाई होईल. मात्र, शेतकऱ्यांना वेठीस धरता कामा नये. यामुळेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निर्देशानुसार आवश्यक असलेली रक्कम जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दक्षिण नागपूरचा वर्षपूर्ती अहवाल प्रकाशितदक्षिण नागपूरचे आ. सुधाकर कोहळे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोख मांडणारा अहवाल तयार केला आहे. या अहवालाचे प्रकाशन मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. शहर व जिल्ह्यात आपला वर्षपूर्ती अहवाल प्रकाशित करणारे कोहळे हे पहिले आमदार ठरले. मेळाव्याला विलंब, कार्यकर्ते सुस्तलोकसंवाद मेळाव्याची वेळ सकाळी १० ची होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे मेळाव्यासाठी वेळेवर आले असते तर शिक्षकर सहकारी बँकेच्या सभागृहात पाच-पंचवीसही कार्यकर्ते दिसले नसते. तासभराने ११ पर्यंत सभागृह अर्धे भरले. ११.३५ वाजता दानवे आले असता सभागृह भरले होते. केंद्र, राज्य, महापालिका व जिल्हा परिषदेतही सत्ता असताना पक्षाच्या कार्यक्रमासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह का नाही, कार्यकर्ते वेळेचे बंधन का पाळत नाही, कार्यकर्ते सुस्त झाले आहेत का, अशी चर्चा याप्रसंगी उपस्थित नेत्यांमध्ये रंगली होती. कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही, असा ग्रह झाला असल्यामुळे तर कार्यकर्ते उशिरा आले नसतील ना, असाही सूर लावल्या जात होता.