शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चित्रांश कंपनीच्या कार्यालयात हंगामा

By admin | Updated: March 4, 2015 02:27 IST

दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या

लाभार्थ्यांचे चेक बाऊ न्स : पोलिसांची मध्यस्थीनागपूर : दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये देण्याची योजना चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनी शहरात राबवित आहे. या योजनेतील काही लाभार्थ्यांचे धनादेश न वटल्याने, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात हंगामा केला. चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा.लि. ही जाहिरात कंपनी आहे. कंपनीने ७ ते ८ महिन्यांपासून शहरात अभिनव योजना राबविली आहे. कंपनी शहरातील दुकानमालकांकडून ३५ ते ४० हजार रुपये घेऊन टीव्ही संच लावते. या टीव्हीवर मोठमोठ्या कंपनीच्या जाहिरातीचे प्रक्षेपण करते. या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये दिले जातात. काही लाभार्थ्यांचा धनादेश दोन महिन्यापासून वटला नाही. हे लाभार्थी काही दिवसांपासून कार्यालयाच्या चकरा मारत आहे. अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करीत आहे. मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने, आज शेकडो लाभार्थ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. पैशासाठी कार्यालयात जोरदार हंगामा केला. दरम्यान सदर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्याने, लाभार्थ्यांना पुन्हा मोबदल्याचा चेक देण्यात आला. कंपनीच्या कार्यालयात जवळपास तीन तास हंगामा सुरू होता. लाभार्थ्यांनी कंपनीवर आरोप केले असले तरी, या प्रकरणाची कुठलीही तक्रार पोलिसांकडे केली नाही. (प्रतिनिधी) 

कंपनीने आमची फसवणूक केली४या कंपनीने लाभार्थ्यांशी तीन वर्षाचे अ‍ॅग्रीमेंट केले आहे. यात पहिले सहा महिने लाभार्थ्यांना ७ हजार, ६ ते १२ महिन्यापर्यंत ८ हजार व १२ ते ३६ महिन्यापर्यंत १०,००० रुपये देईल, असा करारात उल्लेख आहे. मात्र पहिल्या सहा महिन्यातच कंपनीचे धनादेश वटविण्यात अडचणी येत आहे. हंगामा करणाऱ्या काही लाभार्थ्यांनी कंपनी आमची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. आमचे पैसे परत द्या, आपला टीव्ही घेऊन जा, अशी मागणी त्यांनी केली.  

दुसऱ्या कंपनीची चाल आहे४या कंपनीतील एक अधिकाऱ्याने कंपनीचा राजीनामा देऊन, दुसरी कंपनी स्थापन करून अशीच योजना राबविली आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनीची ही चाल असल्याचे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना समजविले.जवळपास ७० हजार ग्राहक !४या कंपनीने संपूर्ण जिल्ह्यात जाळे पसरविले आहे. जवळपास ७० हजार ग्राहक असल्याची माहिती आहे. प्रतिमाह ७ हजार रुपयांच्या लालसेपोटी अनेक ग्राहकांनी कर्ज काढून ३५ ते ४० हजार रुपये कंपनीकडे जमा केले आहे.