शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

१५ दिवसात समितीचा निर्णय : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:02 IST

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.हैदराबाद हाऊस नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी तसेच आमदार बच्चू कडू व विभागीय आयुक्त अश्विन मुद्गल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच महसूल व जलसंपदा विभागांच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पातील बाधित गावांपैकी काही गावांचे पुनर्वसन झाले आहे व काही गावांचे अद्याप बाकी आहे. अशा गावांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. ज्या गावात नागरी सुविधा बंद आहेत. अशा गावात नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच विजेचे प्रश्न सोडविणे यासंदर्भातही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

आ. बच्चू कडूंसह एक हजार आंदोलकांवर गुन्हे  दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू तसेच भंडारा येथील बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, अरुण हटवार, राजेंद्र वाघ, मंगेश वंजारी, रमेश कारेमोरे, भाऊ कातोरे, रूपेश कातोरे, रूपेश आतिलकर आणि सुमारे एक हजार आंदोलकांवर शनिवारी सीताबर्डी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आ. कडू आणि आंदोलकांवर  बेकायदा जमाव जमवून आमदार निवासातील अन्य रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पाण्याच्या टँक खाली फेकणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा आरोप लावला आहे. त्यानुसार, या सर्वांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४२७ भादंवि तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प