शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मनपाच्या बजेटला आयुक्तांची कात्री

By admin | Updated: January 28, 2016 02:57 IST

स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) रद्द झाल्याने महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला आहे.

४९०.१४ कोटींचा कट : सुधारित बजेट १४७४.९८ कोटींचे नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) रद्द झाल्याने महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला आहे. या मोबदल्यात शासनाकडून अपेक्षित असलेले सहायक अनुदान प्राप्त झालेले नाही. तसेच मालमत्ता, पाणीपट्टी व इतर स्रोतातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ४९०.१४ कोटींची कात्री लावली आहे. १४७४.९८ कोटींचा सुधारित तर २०१६-१७ या वर्षाचा १५३४.४५ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी त्यांनी स्थायी समितीला सादर केला आहे.महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प १९६५.१२ कोटींचा होता. परंतु २६ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ७०० कोटींचाच महसूल झाला. पुढील दोन महिन्यात ७७४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून ३१ मार्च २०१६ पर्यंत १४७४ .९८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. हर्डीकर यांनी २०१५-१६ या वर्षाचा १२९४.६७ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता.दोन महिन्यात ७७४ कोटीनागपूर : पुढील दोन महिन्यात ३१ मार्च पर्यंत ७७४ कोटींची कर वसुली करावी लागणार आहे. यात एलबीटीपासून १८५ कोटी, मालमत्ता करातून १४० कोटी, पाणीपट्टीतून ८२ कोटी, नगररचना विभाग ५३ कोटी, एलबीटी अनुदान १५५ कोटी, बाजार विभागाकडून ३.८५ कोटी, इतर विभागापासून ५० कोटी तर शासनाकडून १०० कोटींचे अनुदान अपेक्षित असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. विकास कामांना बाधा नाहीमहापालिकेच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांनी २२ टक्के कात्री लावली आहे. परंतु यामुळे शहरातील विकास कामांवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम होणार नाही. निधीची गरज भासलीच तर सभागृहाची मंजुरी घेऊ न तो उपलब्ध केला जाईल. प्रशासनाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने परिणाम झाला आहे. अर्थसंकल्पातील ८० टक्के कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. रमेश सिंगारे, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिकाउद्दिष्ट साध्य करणारमहापालिकेचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प वास्तवावर आधारित आहे. ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यात येतील. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. परंतु जे उद्दिष्ट गृहीत धरण्यात आलेले आहे. ते निश्चित पूर्ण केले जाईल. नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त बोजा पडणार नाही.श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका