शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

परत येरे माझ्या मागल्या

By admin | Updated: September 21, 2014 01:14 IST

‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील

नागपूर विद्यापीठ : ‘नॅक’ जाताच वसतिगृहात अस्वच्छतानागपूर : ‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील ऐन वेळेवर स्वच्छता करण्यात आली होती. परंतु ‘नॅक’ची पाठ वळल्यावर परत अस्वच्छता दिसून येत असून प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. एकूणच सर्वकाही ‘आॅल इज वेल’चा हा ‘ड्रामा’ केवळ आठवड्याकरिताच होता अशी विद्यार्थ्यांमध्ये भावना आहे.‘नॅक’ समितीच्या पाहणीदरम्यान विद्यापीठाची चांगली प्रतिमा समोर यावी याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. एरवी जिकडे अधिकारी ढुंकूनदेखील पाहत नाहीत अशा पदव्युत्तर वसतीगृहाला चकाचक करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाची बाजू राखण्यासाठी ‘नॅक’ समितीच्या सदस्यांसमोर त्यांच्या समस्या बोलून दाखविल्या नाहीत. परंतु ‘नॅक’ समिती जाऊन आठवडादेखील उलटत नाही तो वसतीगृहाची अवस्था परत खराब व्हायला लागली आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून पाईपलादेखील गळती लागली आहे. सोबतच परिसरातदेखील अस्वच्छता वाढीस लागली आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.सोबतच वसतीगृहात नवीन वॉटर कूलर लावण्यात आला होता. परंतु त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद पडला असून यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून याची दखलदेखील घेण्यात आलेली नाही. वसतीगृहात काही महिन्यांअगोदर नवा कोरा टीव्ही मागविण्यात आला. अनेक दिवस बंदच असलेला टीव्ही ‘नॅक’ समितीला दाखविण्यासाठी ठेवण्यात तर आला, परंतु ‘सेट टॉप बॉक्स’च नसल्याने विद्यार्थ्यांना टीव्ही पाहण्याची सोयच उरलेली नाही.‘कॅम्पस’मधील अनेक विभागांची चमकदेखील उतरायला लागली आहे. अनेक विभागांमध्ये ‘नॅक’ समिती गेल्यापासून स्वच्छताच झालेली नाही. काही विभागांत परत पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. ‘नॅक’चा उत्कृष्ट दर्जा जरी मिळाला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच काय असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)