शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काव्यमैफिलीत चढरे रंग वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:06 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अतरंगी ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींनी नागपूरच्या गारठवून सोडणाऱ्या गारठ्यात चेतनेची ऊर्जा भरली आणि काव्यमैफिलीतून नागपूरकर रसिकांवर वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंगरसांचे रंग उधळले गेले.

ठळक मुद्देकविसंमेलन : सैनिक कवितेने पाणावले डोळेखासदार सांस्कृतिक महोत्सवात रसिकांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कवी चंद्रावर जाऊन तेथील दुधाळ प्रकाशाने मंगळाला प्रकाशमान करू शकतो आणि गुरूवर प्राणवायू सोडून तेथे वस्ती थाटू शकतो. कवीच्या कल्पनेला कसलाच लगाम नाही आणि त्याच्या कल्पकतेतून निघणाऱ्या प्रत्येक व्यंगाला सारगर्भित संदर्भ असतो. कवी करुणरसाने रडवतो, व्यंगरसाने हसवतो आणि वीररसाने स्फुल्लिंग जागवतो. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अतरंगी ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींनी नागपूरच्या गारठवून सोडणाऱ्या गारठ्यात चेतनेची ऊर्जा भरली आणि काव्यमैफिलीतून नागपूरकर रसिकांवर वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंगरसांचे रंग उधळले गेले.क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी ‘अखिल भारतीय हास्य व्यंग कविसंमेलन’ उत्साहात पार पडले. ‘यूथ आयकॉन ऑफ इंडिया’ आणि ब्रिटिश संसदेने गौरविलेल्या प्रसिद्ध अभिनेता व हास्य-व्यंग कवी शैलेश लोढा यांच्यासह नागपूरचे साहित्यिक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर ज्येष्ठ कवी मधुप पाण्डेय, उज्जैनचे दिनेश दिग्गज, दिल्लीचे प्रवीण शुक्ल, दिल्लीच्याच गजल-गीत गायिका मुमताज नसीम, जयपूरचे संजय झाला व कोटा येथील जगदीश सोळंकी यांनी एकसाथ या कविसंमेलनात काव्यांचे कारंजे उडविले. या संपूर्ण संमेलनाचे सूत्र जगदीश सोळंकी यांनी आपल्या चिरपरिचित अंदाजात सांभाळले आणि टप्पे-टोणपे मारत रसिकांना सतत हसवण्याचे काम केले. व्यासपीठावर हजर असलेल्या सर्व कवींचे समन्वयन इतके रसिले आणि शांत डोक्याचे होते की जणू हे सगळे कायम गारठलेल्या अवस्थेत असलेल्या प्लुटोवरून आलेले असावे. एकूणच नागपूरकरांनी पडलेल्या कडाक्याच्या थंडीतही या सगळ्यांच्या काव्यरसांचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री व महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर, महापौर संदीप जोशी, भारत विकास परिषदेचे सुरेश गुप्ता, टेक्स्टाईल आयुक्त डॉ. माधवी खोडे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके उपस्थित होते. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.अनिल सोले यांच्या ‘आत्मधून’चे प्रकाशनयावेळी आ. अनिल सोले यांच्या ‘आत्मधून’ या तिसऱ्या काव्यसंमेलनाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कविसंमेलनाच्या अघोषित नियमानुसार ज्या भागात काव्यसंमेलन असते, त्या भाषेतील एक कविता सामावून घेण्याचा पायंडा इथेही कायम ठेवण्यात आला. खास मधुप पाण्डेय यांच्या आग्रहावरून आ. अनिल सोले यांनी त्यांच्या दोन कविता संमेलनात सादर केल्या.राजकीय टोणप्यांनी टाळ्यांचा कडकडाटयावेळी कवींनी व्यंगात्मक कवितांतून राजकीय कटाक्षही टाकला. दिल्लीचे केजरीवाल यांनी केलेले वादे आणि वास्तवात उतरलेले वादे यावर विनोदी शैलीत प्रहार केला. सोबतच नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केलेले भाष्य ‘क्रिकेट आणि राजकारण अखेरच्या चेंडूपर्यंत चालते’ यावर कटाक्ष टाकताना तुम्हाला सुपर ओव्हरचा विसर पडला आणि महाराष्ट्रातही डॉन ब्रॅडमॅन आहे, हेही विसरला असल्याचा टोला शैलेश लोढा यांनी लगावला. यावर गडकरी मनमोकळेपणाने हसताना दिसले. सोबतच, कधी काळी दिवसाला २ किमी बनणारे रस्ते गडकरींमुळे आत २१ किमी प्रति दिवस बनत असल्याचा गौरवोद्गारही लोढा यांनी यावेळी काढले.गडकरी कराचीतूनही निवडून येतीलनितीन गडकरी यांचे काम इतके मोठे की ते कराचीतून निवडणूक लढवतील तरी निवडून येतील. दुसरा देश तयार केला तर ते पंतप्रधानही होतील, अशी टिपणी संजय झाला यांनी केली. देशभर फिरलो पण एखाद्या खासदाराने इतका मोठा सांस्कृतिक महोत्सव पहिल्यांदाच पाहिला, असे म्हणत कवी प्रवीण शुक्ल यांनी कौतुक केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर