शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

गुणवत्तेसाठी महाविद्यालयांना स्वायत्तता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:56 IST

विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : शिवाजी विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालये जास्तीत जास्त प्रमाणात स्वायत्त झाली पाहिजेत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समोरप, नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कारसमारंभ शनिवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी, आ.अनिल सोले, आ.रणधीर सावरकर, महापौर नंदा जिचकार, संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.ज्ञान आणि गुणवत्ता हेच देशाचे महत्त्वपूर्ण भांडवल असून याआधारेच उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होऊ शकते. देशाच्या लोकसंख्येतील मोठी संख्या तरुणांची असून उत्तम मनुष्यबळ निर्मितीसाठी ही आपल्यासाठी संधी आहे. महाविद्यालयांत ‘अप्लाईड’ ज्ञानावर भर दिला गेला पाहिजे. महाविद्यालयांना गुणवत्तेनुसार मानांकन देऊन स्वायत्तता दिल्याने संशोधन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे फडणवीस म्हणाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील शिक्षणाचा दर्जा त्यांनी कायम राखला आहे. विदर्भात संस्थेने मोठे काम केले आहे. यापुढेदेखील असेच काम सुरू राहील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी हर्षवर्धन देशमुख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ.देवेंद्र बुरघाटे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. बारावीतील गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे सचिव व्ही.जी.भांबुरकर यांनी संस्थेचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर फुले यांनी केले तर दीपक कडू यांनी आभार मानले.यावेळी मंचावर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड.गजानन पुंडकर, दिलीप इंगोले, सुहास गोंगे, हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोगमुख्यमंत्र्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोग करणाºयांवर टीका केली. एखाद्या गोष्टीत विनाकारण अडथळा निर्माण करणे, किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी या कायद्याचा काही लोक दुरुपयोग करतात. ही प्रवृत्ती योग्य नाही, असे ते म्हणाले.