शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी महाविद्यालयांना स्वायत्तता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:56 IST

विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : शिवाजी विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालये जास्तीत जास्त प्रमाणात स्वायत्त झाली पाहिजेत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समोरप, नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कारसमारंभ शनिवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी, आ.अनिल सोले, आ.रणधीर सावरकर, महापौर नंदा जिचकार, संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.ज्ञान आणि गुणवत्ता हेच देशाचे महत्त्वपूर्ण भांडवल असून याआधारेच उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होऊ शकते. देशाच्या लोकसंख्येतील मोठी संख्या तरुणांची असून उत्तम मनुष्यबळ निर्मितीसाठी ही आपल्यासाठी संधी आहे. महाविद्यालयांत ‘अप्लाईड’ ज्ञानावर भर दिला गेला पाहिजे. महाविद्यालयांना गुणवत्तेनुसार मानांकन देऊन स्वायत्तता दिल्याने संशोधन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे फडणवीस म्हणाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील शिक्षणाचा दर्जा त्यांनी कायम राखला आहे. विदर्भात संस्थेने मोठे काम केले आहे. यापुढेदेखील असेच काम सुरू राहील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी हर्षवर्धन देशमुख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ.देवेंद्र बुरघाटे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. बारावीतील गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे सचिव व्ही.जी.भांबुरकर यांनी संस्थेचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर फुले यांनी केले तर दीपक कडू यांनी आभार मानले.यावेळी मंचावर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड.गजानन पुंडकर, दिलीप इंगोले, सुहास गोंगे, हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोगमुख्यमंत्र्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोग करणाºयांवर टीका केली. एखाद्या गोष्टीत विनाकारण अडथळा निर्माण करणे, किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी या कायद्याचा काही लोक दुरुपयोग करतात. ही प्रवृत्ती योग्य नाही, असे ते म्हणाले.