शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा होतोय ऋतूंच्या कालावधीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ...

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील हवामानाच्या वेळापत्रकात मागील काही वर्षांपासून चिंताजनक बदल घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळेच ऋतुमानात हे बदल घडत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी हे सर्वाधिक थंडीचे महिने मानले जात असले तरी या वर्षात दोन दिवसांचा अपवाद वगळता या संपूर्ण कालावधीत थंडीचा अनुभव आला नाही.

विदर्भ उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र २०१९ मध्ये विदर्भातील उन्हाळा म्हणावा तसा तापला नाही. मुख्यतः मागील वर्षात बहुतेक काळ पाऊसच अनुभवला. यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधताना एनईईआरआयचे संचालक राकेश कुमार म्हणाले, एका वर्षाच्या बदलाला हवामान बदलाचे श्रेय दिले जाऊ शकत नाही. मात्र ऋतुमानामध्ये दिसणारा बदल वैश्विक तापमानाकडे दिशानिर्देश करणारा आहे. हवामान अनिश्चित बनले असले तरी हिवाळा पूर्णपणे नाहीसा झाला असे म्हणता येणार नाही. या बदलामुळे वनस्पती, पिके तसेच रोगप्रणालीत बदल दिसेल, असेही ते म्हणाले.

नागपूर हवामान विभागाच्या सूत्रांच्या मते, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान खाली येऊन १० ते १२ अंशांच्या आसपास पोहोचले. उत्तरेकडून वारे येताना मध्य भारताला थंडीचा अनुभव येतो. मात्र त्याच वेळी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळ अभिसरण तयार झाल्याने आणि अरबी समुद्रामध्ये उत्तर-पश्चिम दिशेने येणारे वारे दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रोखले गेले. यामुळे यावर्षी हिवाळा अनुभवला नाही. तज्ज्ञांच्या मते, यावर्षी पुन्हा हिवाळा उशिरा होण्याची शक्यता आहे.

जागतिक तापमानवाढ २ अंशाच्या पुढे वाढल्यास हिंदुकुश हिमालयावरील हिमनग वितळतील. त्यामुळे संबंधित देशांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागण्याची शक्यता राहील.

...

कोट

हिमालयातील बर्फ वितळत असल्याने भारत आणि चीनमधील प्रमुख नद्यांमध्ये अखेरीस पाणी कमी होईल. उष्ण पाण्यामुळे चक्रीवादळ आणि उष्णकटिबंधीय वादळे वेगवान वाऱ्यासह अधिक वेगवान बनतात. वादळे उष्ण समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा आणतात. त्यामुळे मध्यम कमकुवत वादळापासून तीव्र आणि विध्वंसक वादळ होऊ शकते. भविष्यात भारतालाही याचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

- पेटेरी टॅलस, महासचिव, जागतिक हवामान संस्था

...

...