शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:13 IST

स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली.

ठळक मुद्देसहा महिन्यात ३४.३३ कोटींचे बिल : कंपनीने केली ७.३३ कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली. असे असतानाही शहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडचे घर भरण्याचा प्रकार सुरूच आहे. कचरा संकलनासाठी कंपनीला २७ कोटींची रक्कम देण्याचे ठरले असताना कंपनीने वित्त वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यासाठी ३४ .३३ कोटींचे बिल महापालिकेला दिले आहे. महापालिकेने या रकमेसह वाढीव ७.३३ कोटींची अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी चालविली आहे. गुरुवारी होणाºया महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.बिलाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ झाल्याने शहरात कचरा होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित के ला जातो. हा कचरा उचलून भांडेवाडी येथे नेण्याचा खर्च कनकला दिला जातो तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. सध्या २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाते.कचरामुक्त शहराची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून महापालिकेने २४ डिसेंबर २००७ रोजी स्थायी समितीने १० वर्षांसाठी कनक रिसोर्सेसला काम दिले होते. १२ जून २०१४ रोजी वर्षाला २७ कोटींच्या आधारावर पाच वर्र्षांसाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु कचरा संकलनाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बिलातील घोळाची चौकशीकनक रिसोर्सेस मॅनेजमेंटवर कचरा संकलन व दर तसेच बिलात घोळ केल्याचा आरोप आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कचरा संकलनाच्या दरात वाढ करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने महापालिकेतील अधिकाºयांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. याची चौकशी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कचरा संकलनाचे वाढीव बिल ही एक मोठी समस्या मानली जात आहे.कचरागाड्या येत नाहीकचरा संकलनासाठी कनकच्या गाड्या घरोघरी जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कंपनीकडे १००४ वाहने आहेत. शहरातील मध्य भागात कचरा घराघरातून संकलित केला जातो. इतर भागातील परिस्थिती वेगळी आहे. अनेक वस्त्यात दिवसभर कचरा रस्त्यांवर पडून असतो. परंतु कपंनी कचरा उचलत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.