शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची बोंब;बिल मात्र अव्वाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:13 IST

स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली.

ठळक मुद्देसहा महिन्यात ३४.३३ कोटींचे बिल : कंपनीने केली ७.३३ कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर २० व्या क्र मांकावरून १३७ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. क्र मांक घसरल्याने महापौरांसह अधिकाºयांची कोंडी झाली. असे असतानाही शहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडचे घर भरण्याचा प्रकार सुरूच आहे. कचरा संकलनासाठी कंपनीला २७ कोटींची रक्कम देण्याचे ठरले असताना कंपनीने वित्त वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यासाठी ३४ .३३ कोटींचे बिल महापालिकेला दिले आहे. महापालिकेने या रकमेसह वाढीव ७.३३ कोटींची अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी चालविली आहे. गुरुवारी होणाºया महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.बिलाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ झाल्याने शहरात कचरा होण्याचे प्रमाणही दुपटीने वाढले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित के ला जातो. हा कचरा उचलून भांडेवाडी येथे नेण्याचा खर्च कनकला दिला जातो तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. सध्या २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाते.कचरामुक्त शहराची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून महापालिकेने २४ डिसेंबर २००७ रोजी स्थायी समितीने १० वर्षांसाठी कनक रिसोर्सेसला काम दिले होते. १२ जून २०१४ रोजी वर्षाला २७ कोटींच्या आधारावर पाच वर्र्षांसाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु कचरा संकलनाच्या रकमेत अचानक दुपटीने वाढ करण्यात आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.बिलातील घोळाची चौकशीकनक रिसोर्सेस मॅनेजमेंटवर कचरा संकलन व दर तसेच बिलात घोळ केल्याचा आरोप आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. कचरा संकलनाच्या दरात वाढ करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने महापालिकेतील अधिकाºयांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. याची चौकशी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कचरा संकलनाचे वाढीव बिल ही एक मोठी समस्या मानली जात आहे.कचरागाड्या येत नाहीकचरा संकलनासाठी कनकच्या गाड्या घरोघरी जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कंपनीकडे १००४ वाहने आहेत. शहरातील मध्य भागात कचरा घराघरातून संकलित केला जातो. इतर भागातील परिस्थिती वेगळी आहे. अनेक वस्त्यात दिवसभर कचरा रस्त्यांवर पडून असतो. परंतु कपंनी कचरा उचलत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.