शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

क्लीन चिट ही सारवासारव

By admin | Updated: July 18, 2016 02:42 IST

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत राज्य सरकारला घेरण्याची रणनीती आखली

प्रफुल्ल पटेल : खडसे प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करावी नागपूर : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत राज्य सरकारला घेरण्याची रणनीती आखली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने सरकारवर नेम साधला. खडसे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल न करण्याचा प्रकार म्हणजे सरकारची मलीन झालेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करावी, अशी मागणी पटेल यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी ईद मिलन समारंभ आयोजित करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. पटेल म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या पीएने लाच मागितल्याच्या आरोपातून एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सरकारी बंगल्यात लाच मागण्याची घटना घडली. असे असतानाही केवळ सरकारची अब्रू वाचविण्यासाठी खडसे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, हे दाखविण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. राज्य सरकारचे मंत्री एकामागून एक आरोपीच्या पिंजऱ्यात सापडत आहेत. नव्याने केलेल्या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. ही प्रतिमा सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. खडसे प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी) जम्मू हिंसाचारासाठी केंद्र व राज्य जबाबदार गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेली रणनीती अपयशी ठरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिघळण्यासाठी मोदी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. यापूर्वी काश्मीरची स्थिती एवढी कधीही बिघडलेली नव्हती. काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असल्याने मोदी सरकारचे या स्थितीवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सरकार पाडण्याचे केंद्राचे प्रयत्न निषेधार्ह अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने डाव रचले. मात्र, या कृतीवर न्यायालयाने योग्य आदेश देत लोकशाहीला मारक निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे. इतर पक्षाची सरकारे पाडण्यासाठी मोदी सरकारतर्फे केले जाणारे प्रयत्न निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली.