शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

क्लीन चिट ही सारवासारव

By admin | Updated: July 18, 2016 02:42 IST

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत राज्य सरकारला घेरण्याची रणनीती आखली

प्रफुल्ल पटेल : खडसे प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करावी नागपूर : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत राज्य सरकारला घेरण्याची रणनीती आखली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने सरकारवर नेम साधला. खडसे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल न करण्याचा प्रकार म्हणजे सरकारची मलीन झालेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करावी, अशी मागणी पटेल यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी ईद मिलन समारंभ आयोजित करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. पटेल म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या पीएने लाच मागितल्याच्या आरोपातून एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सरकारी बंगल्यात लाच मागण्याची घटना घडली. असे असतानाही केवळ सरकारची अब्रू वाचविण्यासाठी खडसे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, हे दाखविण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. राज्य सरकारचे मंत्री एकामागून एक आरोपीच्या पिंजऱ्यात सापडत आहेत. नव्याने केलेल्या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. ही प्रतिमा सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. खडसे प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी) जम्मू हिंसाचारासाठी केंद्र व राज्य जबाबदार गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेली रणनीती अपयशी ठरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिघळण्यासाठी मोदी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. यापूर्वी काश्मीरची स्थिती एवढी कधीही बिघडलेली नव्हती. काश्मीर प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असल्याने मोदी सरकारचे या स्थितीवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सरकार पाडण्याचे केंद्राचे प्रयत्न निषेधार्ह अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने डाव रचले. मात्र, या कृतीवर न्यायालयाने योग्य आदेश देत लोकशाहीला मारक निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे. इतर पक्षाची सरकारे पाडण्यासाठी मोदी सरकारतर्फे केले जाणारे प्रयत्न निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली.