शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ; पंतप्रधानांना भेटण्याच्या आश्वासनांचे काय झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 18:57 IST

बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व साहित्यिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवू, असे आश्वासन दिले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मात्र महिने लोटूनही याबाबत कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या घोषणांचा विसर पडला का, असा प्रश्न अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देअ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व साहित्यिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवू, असे आश्वासन दिले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मात्र महिने लोटूनही याबाबत कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या घोषणांचा विसर पडला का, असा प्रश्न अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला आहे.साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेला मोठी आशा दिली होती. मराठीचा अभिजात प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र  सरकार आग्रही आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची घोषणा त्यांनी आणि शिक्षणमंत्री तावडे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली होती. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारने पुरावे दिले आहेत. चेन्नई कोर्टातील केसमुळे प्रक्रिया थांबली होती, पण केस निकाली निघाल्यानंतर आम्ही त्याच आधारे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठवला असून तो केंद्रीय मंत्रिमंडळाला मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच निर्णय घेईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार आग्रहाने हा मुद्दा केंद्राकडे मांडत असल्याचे सांगण्यात आले होते. एक महिन्याच्या आत महामंडळासोबत बैठक घेऊन मराठी भाषेचे प्रश्न मार्गी लावू, अभिजात दर्जासाठी साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला नेऊ, मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी सुचविलेली तज्ज्ञांची समिती स्थापली जात असल्याचे कळवले होते. मात्र सगळ््या घोषणांचे नेमके काय झाले, या घोषणा हवेतच विरल्या का, अशी विचारणा जोशी यांनी केली आहे.१५ मार्चला पुन्हा दिले निवेदनसाहित्य संमेलनानंतर साहित्य महामंडळाने १५ मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मागण्यांचे निवेदन त्यांना दिले होते. बंगाली, कानडी, तेलगू हा विषय त्यांच्या राज्यात सक्तीचा आहे.  महाराष्ट्रात  १२ वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करणारा शिक्षण कायदा करावा, मराठी विकास प्राधिकरण स्थापन करावे, मराठी भाषा विभागात संचालकपद निर्माण करावे आणि मराठी भाषा विभागासाठी किमान १०० कोटींची तरतूद करावी, या मागण्या त्यांना सांगितल्या होत्या. सोबत मराठी शिक्षण कायद्याचे प्रारूपही त्यांना दिले होते. त्यांनीही सरकार यासाठी गंभीरपणे पावले उचलेल असा विश्वास दिला होता. मात्र त्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नसल्याने हे सरकारही अपेक्षाभंग करेल काय, अशी साशंकता डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली.मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्य महामंडळाने अनेकदा राज्य शासनाशी संवाद साधला, निवेदने दिली, बैठका घेतल्या, सरकारकडून आश्वासनही मिळाले. पण पुढचे काहीच होत नाही. कुठल्या हालचाली दिसत नाही आणि साहित्यिकांशी व महामंडळाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्या जात नाही. आता आम्ही काय करावे, अशी सरकारची अपेक्षा आहे?

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य