शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वीज स्वयंपूर्णतेचा दावा फसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:39 IST

महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता. परंतु भाजप सरकारने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याच्या दाव्यासारखा वीज स्वयंपूर्णतेचा दावाही फसवा आहे, असा आरोप माजी मंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने भारनियमन आणि वाढीव विद्युत बिलाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, भारनियमनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना भारनियमन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांच्या अभ्यासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारनियमनामुळे उद्योजक, कारखानदार, दुकानदार, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. कोळशाअभावी भारनियमन सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी २२ आॅगस्टलाच सरकारला पत्राद्वारे कोळसा नसल्याने वीज केंद्रे अडचणीत येऊ शकतात, अशी सूचना केली होती.शासनाने याबाबत योग्य नियोजन का केले नाही, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. आंदोलनात ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, दुनेश्वर पेठे, महिला अध्यक्ष अलका कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर उपाध्यक्ष नूतन रेवतकर, राजू नागूलवार, विनोद हेडाऊ, जतीन मलकान, अर्चना हरडे, उज्वला बोढारे, वर्षा श्यामकुळे, अविनाश गोतमारे, बंडु उमरकर, नरेश अडसरे, दिनकर वानखेडे, सुखदेव वंजारी यांच्यासह शहर पदाधिकारी आणि नागपूर ग्रामीणमधून आलेले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.