शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘4जी’च्या खड्ड्यांमुळे शहर विद्रूप

By admin | Updated: February 4, 2015 00:59 IST

नियमित डांबरीकरण व देखभाल केली जात नसल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यातच ‘4जी’ नेटवर्क टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले जात असल्यामुळे

अपघात वाढले : १४४ किलोमीटर लांब रस्त्यांवर नेटवर्क राजीव सिंह - नागपूरनियमित डांबरीकरण व देखभाल केली जात नसल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यातच ‘4जी’ नेटवर्क टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले जात असल्यामुळे शहरवासीयांचा त्रास वाढला आहे. सुरुवातीलाच ही अवस्था असल्यामुळे पुढे चालून हे खड्डे शहर विद्रूप करेल. १४४ किलोमीटर लांब रस्त्यांवर नेटवर्क टाकण्यात येणार आहे. मनपाने रिलायन्स कंपनीला नेटवर्क टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतु, नेटवर्कसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित भरले जात आहेत काय याकडे लक्ष देणारा कुणीच नाही. यामुळे खड्ड्यांची संख्या सतत वाढत आहे. बाजार असो वा रहिवासी कॉलनी प्रत्येक ठिकाणी मातीचे ढिगारे व खड्डे दिसून येत आहेत. काही ठिकाणी मशीनही रस्त्यावरच उभी ठेवली जाते. केबल टाकण्यासाठी १०० मीटर अंतरावर खड्डे खोदण्यात येत आहेत. मशीनच्या साहायाने केबल टाकल्यानंतर खड्डे मातीने भरले जातात. यामुळे अपघात होत आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन काम बंद करण्याची मागणी केली होती. काय आहे नियमओसीडब्ल्यू, महावितरण व अन्य विभागांना पाईपलाईन किंवा केबल टाकण्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार १०० मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम बुजवून पुढील कामाला सुरुवात करावी लागते. असे न केल्यास मनपा संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकते. दुसऱ्या पर्यांयांतर्गत मनपा स्वत: खड्डे बुजवून त्याचा खर्च कंपनीकडून वसूल करू शकते. ओसीडब्ल्यूच्या प्रकरणात असेच करण्यात आले होते. नेटवर्कसाठी वीज खांबांचा उपयोगशहरवासीयांना लवकर ‘4जी’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वीज खांबांवरून तार टाकल्या जात आहेत. सध्या ५००० विद्युत खांबांवर तार टाकल्या जाणार आहेत. यातून मनपाला प्रति खांब २५० रुपये याप्रमाणे १ कोटी ४४ लाख रुपये उपलब्ध होतील.वाहनचालक कोसळताहेतगांधीगेटकडून चिटणवीस पार्ककडे वळताना ‘4जी’ नेटवर्कसाठी खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे. यामुळे वाहनचालक कोसळून अपघात होत आहेत. हा रस्ता त्वरित पूर्ववत करण्याची गरज आहे.मनपा झटकतेय जबाबदारीयासंदर्भात संबंधित प्रकरणाचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) महेश गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ते कार्यालयातही उपस्थित नव्हते. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. जयस्वाल यांनी वीज खांबांवर अस्थायी नेटवर्क टाकण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. यातून मनपाला उत्पन्न मिळत आहे. समस्येचे काहीच कारण नाही, असे ते म्हणाले.वाहतूक विस्कळीतडालडा फॅक्टरीजवळ मोठा खड्डा आहे. यातून रंगीबेरंगी पाईप निघालेले आहेत. आजूबाजूला मातीचे ढीग आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत होते. वाहनचालकांसोबत पायी चालणाऱ्यांनाही त्रास होत आहे.लक्ष्मीनगर झोनमध्ये आंदोलन‘4जी’ नेटवर्कमुळे लक्ष्मीनगर झोनमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. झोनचे सभापती गोपाल बोहरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून काम बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिलेली ६ दिवसांची मुदत संपली आहे. यामुळे बोहरे कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.