शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

पेंचचे पाणी शहराला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST

पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देजि.प.च्या आमसभेत ठराव : आधी शेतीला पाणी द्या, सदस्यांची आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. धरणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे हा होता. परंतु पेंच धरणाचा उपयोग ग्रामीण भागासाठी न होता, शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी होतो आहे. शहराने आपली व्यवस्था स्वत: लावावी, हे पाणी केवळ ग्रामीण भागाकरिता आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी जि.प.च्या आमसभेत रेटून धरली. शेवटी अध्यक्षांनी यासंदर्भात ठराव पारित केला.पेंच धरणाचे पाणी ग्रामीण भागाला मिळावे, यासाठी यापूर्वीदेखील जिल्हाधिकाºयांकडे मागणी करण्यात आली होती. आजच्या आमसभेत जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी पेंच धरणाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी पेंचचे पाणी ाागपूर शहराला देऊ नये, असा ठराव पारित करण्याची मागणी केली. परंतु या विषयावर काही सदस्यांचे मतमतांतर होते. त्यामुळे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. अध्यक्षांनी कुंभारे आणि भुते यांना तुम्ही केवळ गुंडागर्दी करण्याकरिता सभागृहात येता, असा आरोप केला. त्यामुळे दोघेही आक्रमक झाले. गुंडागर्दी शब्द मागे घ्यावा, अशी मागणी करू लागले. सभागृहात बराच वेळ गदारोळ सुरू होता.ठराव पारित झाल्याखेरीज सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. अखेर जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांना ही मागणी मान्य करीत ठराव पारित केला. हा ठराव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीजिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. धानाचा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत नागपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी कुंभारे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चिखले यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. दुष्काळाबाबतची मागणी राज्य सरकारकडे लेखी स्वरूपात पाठवू, असे आश्वासन अध्यक्षांनी सभागृहात दिले.पाणी पुरवठा अधिकाºयांवर कारवाईची मागणीजिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे ठप्प पडल्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्यांनी आक्रमक होत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय टाकळीकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी कामे अर्धवट, तर कुठे प्रलंबित असल्यामुळे पाणीपुरवठा विभाग करतोय काय? असा सवाल उपस्थित करून कर्तव्यात कसूर करणारे टाकळीकर व हेमके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटीतून वगळाडीबीटीमुळे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाºया वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा बोजवारा उडाला आहे. या योजनेमुळे जि.प. सदस्यांना रोषाला पुढे जावे लागत आहे. समाजकल्याण, कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचे डीबीटीमुळे वाटप झालेले नाही. त्यामुळे डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्तरावरून निविदा प्रक्रिया राबवून साहित्य वाटपाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर चिखले व उज्ज्वला बोढारे यांनी केली.