शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचे पाणी शहराला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST

पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देजि.प.च्या आमसभेत ठराव : आधी शेतीला पाणी द्या, सदस्यांची आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाले आहेत. धरणाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे हा होता. परंतु पेंच धरणाचा उपयोग ग्रामीण भागासाठी न होता, शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी होतो आहे. शहराने आपली व्यवस्था स्वत: लावावी, हे पाणी केवळ ग्रामीण भागाकरिता आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी जि.प.च्या आमसभेत रेटून धरली. शेवटी अध्यक्षांनी यासंदर्भात ठराव पारित केला.पेंच धरणाचे पाणी ग्रामीण भागाला मिळावे, यासाठी यापूर्वीदेखील जिल्हाधिकाºयांकडे मागणी करण्यात आली होती. आजच्या आमसभेत जि.प. सदस्य भारती गोडबोले यांनी पेंच धरणाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी पेंचचे पाणी ाागपूर शहराला देऊ नये, असा ठराव पारित करण्याची मागणी केली. परंतु या विषयावर काही सदस्यांचे मतमतांतर होते. त्यामुळे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. अध्यक्षांनी कुंभारे आणि भुते यांना तुम्ही केवळ गुंडागर्दी करण्याकरिता सभागृहात येता, असा आरोप केला. त्यामुळे दोघेही आक्रमक झाले. गुंडागर्दी शब्द मागे घ्यावा, अशी मागणी करू लागले. सभागृहात बराच वेळ गदारोळ सुरू होता.ठराव पारित झाल्याखेरीज सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. अखेर जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांना ही मागणी मान्य करीत ठराव पारित केला. हा ठराव लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीजिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. धानाचा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत नागपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी कुंभारे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चिखले यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. दुष्काळाबाबतची मागणी राज्य सरकारकडे लेखी स्वरूपात पाठवू, असे आश्वासन अध्यक्षांनी सभागृहात दिले.पाणी पुरवठा अधिकाºयांवर कारवाईची मागणीजिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे ठप्प पडल्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्यांनी आक्रमक होत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय टाकळीकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी कामे अर्धवट, तर कुठे प्रलंबित असल्यामुळे पाणीपुरवठा विभाग करतोय काय? असा सवाल उपस्थित करून कर्तव्यात कसूर करणारे टाकळीकर व हेमके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटीतून वगळाडीबीटीमुळे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाºया वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा बोजवारा उडाला आहे. या योजनेमुळे जि.प. सदस्यांना रोषाला पुढे जावे लागत आहे. समाजकल्याण, कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचे डीबीटीमुळे वाटप झालेले नाही. त्यामुळे डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्तरावरून निविदा प्रक्रिया राबवून साहित्य वाटपाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर चिखले व उज्ज्वला बोढारे यांनी केली.