शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!

By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST

गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती

पोलीस अधीक्षक : मौदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नागरिकांशी चर्चानागपूर : गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केले.मौदा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीमध्ये चिरव्हा, माथनी, गुमथळा, राहडी, पावडदौना, भूगाव, वरंबा, आसलवाडा, मांगली नांदा, रानमांगली, सुकळी, अंबाडी, एकर्डी, दिघोरी, सोनेगाव राजा, गारली, सावळी, दहेगाव, निहारवानी, धामणगाव, बोरगाव, महादुला, मोहखेडी, मोहाडी, नांदगाव, चितापूर, कुंभारी, मांगली गोसावी, नवेगाव (रेल्वे), कुंभापूर, शिवनी, चारभा, इटघाट, मोहगाव, सुंदरगाव, कोपरा, हिवराबली, डहाडी, भेंडाळा आदी गावातील पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. यासोबतच पत्रकारांकडून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासंबंधी त्यांनी आदेश दिले. यानंतर मौदा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पोलीस दरबार घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस क्वॉर्टर निकामी, नादुरुस्त, पडक्या स्थितीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कांतेवार, चव्हाण, ढवळे, ठाणेदार गायगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)