शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!

By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST

गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती

पोलीस अधीक्षक : मौदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नागरिकांशी चर्चानागपूर : गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केले.मौदा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीमध्ये चिरव्हा, माथनी, गुमथळा, राहडी, पावडदौना, भूगाव, वरंबा, आसलवाडा, मांगली नांदा, रानमांगली, सुकळी, अंबाडी, एकर्डी, दिघोरी, सोनेगाव राजा, गारली, सावळी, दहेगाव, निहारवानी, धामणगाव, बोरगाव, महादुला, मोहखेडी, मोहाडी, नांदगाव, चितापूर, कुंभारी, मांगली गोसावी, नवेगाव (रेल्वे), कुंभापूर, शिवनी, चारभा, इटघाट, मोहगाव, सुंदरगाव, कोपरा, हिवराबली, डहाडी, भेंडाळा आदी गावातील पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. यासोबतच पत्रकारांकडून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासंबंधी त्यांनी आदेश दिले. यानंतर मौदा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पोलीस दरबार घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस क्वॉर्टर निकामी, नादुरुस्त, पडक्या स्थितीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कांतेवार, चव्हाण, ढवळे, ठाणेदार गायगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)