शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!

By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST

गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती

पोलीस अधीक्षक : मौदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नागरिकांशी चर्चानागपूर : गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केले.मौदा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीमध्ये चिरव्हा, माथनी, गुमथळा, राहडी, पावडदौना, भूगाव, वरंबा, आसलवाडा, मांगली नांदा, रानमांगली, सुकळी, अंबाडी, एकर्डी, दिघोरी, सोनेगाव राजा, गारली, सावळी, दहेगाव, निहारवानी, धामणगाव, बोरगाव, महादुला, मोहखेडी, मोहाडी, नांदगाव, चितापूर, कुंभारी, मांगली गोसावी, नवेगाव (रेल्वे), कुंभापूर, शिवनी, चारभा, इटघाट, मोहगाव, सुंदरगाव, कोपरा, हिवराबली, डहाडी, भेंडाळा आदी गावातील पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. यासोबतच पत्रकारांकडून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासंबंधी त्यांनी आदेश दिले. यानंतर मौदा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पोलीस दरबार घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस क्वॉर्टर निकामी, नादुरुस्त, पडक्या स्थितीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कांतेवार, चव्हाण, ढवळे, ठाणेदार गायगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)