शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांमुळे समाधान नगरातील नागरिक असमाधानी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागात मोठमोठ्या वस्त्या तयार होत आहेत. तेथे सोयीसुविधा पुरविण्यात ...

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागात मोठमोठ्या वस्त्या तयार होत आहेत. तेथे सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु दक्षिण नागपुरातील नरसाळा भागातील समाधान नगरातील नागरिक विकासापासून कोसोदूर आहेत. त्यांना रस्ते, गडरलाईनमुळे त्रास होत आहे. आपल्या समस्या सोडविण्याची मागणी ते महापालिकेकडे करीत आहेत.

गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त

समाधाननगरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या सेफ्टी टँंकचे पाणी विहिरीत शिरत आहे. त्यामुळे विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सेफ्टी टँकचे पाणी इतरत्र वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. महानगरपालिकेने या भागात गडरलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटवर पाणी साचते. तसेच प्लॉटवर झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या रिकाम्या प्लॉट धारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

रस्त्यांची वाईट अवस्था

समाधाननगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गिट्टी उखडुन रस्त्यावर पसरली आहे. वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांसाठी नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिलीत. परंतु त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे.

अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरात

समाधाननगरच्या बाजूलाच अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरच्या शेजारी आणून सोडण्यात आली आहे. समाधाननगरात एक पांदण रस्ता आहे. या रस्त्याचा आता नाला झाला आहे. या नाल्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाल्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पांदण रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

रस्त्यांचे डांबरीकरण करावे

‘रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.’

-रमेश गायकवाड, नागरिक

गडरलाईनची सुविधा हवी

‘समाधाननगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून नागरिक गडरलाईनची मागणी करीत आहेत. गडरलाईन नसल्यामुळे सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत जाऊन विहिरी दूषित होत आहेत. त्यामुळे गडरलाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’

-गीता बेंद्रे, महिला

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी

‘अनेक नागरिकांनी रिकामे प्लॉट घेऊन ठेवले आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये झाडे वाढली असून पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. महापालिकेने या रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’

-अल्का सोनारे, महिला

पांदण रस्ता दुरुस्त करावा

‘समाधाननगरच्या बाजूलाच पांदण रस्ता आहे. या रस्त्याचा नाला झाला असून त्यात घाण पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पांदण रस्ता तयार करण्याची गरज आहे.’

-कविता हटवार, महिला

नियमित फवारणी व्हावी

‘पांदण रस्त्याचा नाला झाल्यामुळे या भागात खूप दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित फवारणी करण्याची गरज आहे.’

-ज्ञानेश्वर चरडे, नागरिक

लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम

‘बाजूला असलेल्या अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरच्या शेजारी आणून सोडण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महापालिकेने त्वरीत यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-सुषमा नागपुरे, महिला

........