शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

चक्क राज्यमंत्र्यांनाच मुंबईला जाण्यापासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंगळवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी चक्क कडू यांना विश्रामगृहातच रोखून ठेवले. त्यामुळे त्यांचे मुंबईचे विमान हुकले. या प्रकारामुळे कडू काही काळ संतप्त झाले होते. बच्चू कडू मंत्रिपदावर आल्यानंतरदेखील त्यांचा आंदोलनाचा सोस गेलेला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाच सोस पटला नसल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहे. दरम्यान, त्यांना अडविण्याचे आदेश कुणी दिले, यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले होते.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बच्चू कडू सकाळी ९.१५ च्या विमानाने मुंबईला रवाना होणार होते. सिंचन विभागाच्या विश्रामगृहाबाहेर तैनात पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे काही वेळ तणावदेखील निर्माण झाला होता. अखेर दुपारच्या विमानाने जाण्याची त्यांना परवानगी मिळाली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे त्यांना घ्यायला आले होते. मात्र पुण्याला जायच्या अटीवरच त्यांना नागपुरातून जाण्याची परवानगी मिळाली, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. शासनाचा गैरसमज झाला होता, अशी माहिती कळाली. मात्र नेमके का थांबविले हे समजले नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असतानादेखील कडू यांना अशाप्रकारे का रोखले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंदोलन करायचे असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या : आंबेडकर

मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान राखले पाहिजे. मंत्र्यांना असे बेशिस्त वागता येत नाही व त्यांना आंदोलनाचा अधिकारदेखील नाही. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता. मंत्र्यांनी अगोदर स्वत:ची भूमिका व बंधने स्पष्ट करून घ्यावी. एकतर मंत्रिपदावर राहावे किंवा रस्त्यावर येऊन आंदोलन करावे. कडू यांची भूमिका चुकली आहे, या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.