शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनापर्यंत चीन पाकिस्तान पोहोचूच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपचे अनेक नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपचे अनेक नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे, परंतु एनडीएचाच एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र शेतकऱ्यांच्या या आंदेलनात चीन -पाकिस्तानचा कुठलाही हात नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या आंदोलनापर्यंत चीन-पाकिस्तान पोहोचूच शकत नाही, असे म्हणत त्यांनी या आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर दिला. मात्र पीयूष गोयल यांनी या आंदोलनात माओवादी नक्षलवादी शिरल्याच्या केलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी असे असेल तर याची चौकशी व्हावी, अशी मागणी सुद्धा केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे रविवारी एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आले होते. सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांच्याच हिताचा आहे. अडाणी अंबानी यांना मोठे करण्याचा प्रश्नच येत नाही. ते आधीच मोठे आहेत. या कायद्यात शेतकऱ्यांना ज्या काही सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परंतु सुधारणा करण्यास तयार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास दोन पाऊल पुढे यावे, असे ते म्हणाले.

पत्रपरिषदेत महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे

यावेळी आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकट्याच्या ताकदीवर सत्ता येऊ शकत नाही. आठवले यांनी यावेळी शरद पवार यांना दोन वेळा काँग्रेसने पंतप्रधानपद नाकारल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल्याचे सांगत पवार यांना आम्ही आधीच एनडीए मध्ये येण्याची विनंती केली होती. ते एनडीएमध्ये आले तर राज्याला व देशालाही फायदा होईल, असे सांगितले.