शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी आंदोलनापर्यंत चीन पाकिस्तान पोहोचूच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपचे अनेक नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपचे अनेक नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे, परंतु एनडीएचाच एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र शेतकऱ्यांच्या या आंदेलनात चीन -पाकिस्तानचा कुठलाही हात नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या आंदोलनापर्यंत चीन-पाकिस्तान पोहोचूच शकत नाही, असे म्हणत त्यांनी या आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर दिला. मात्र पीयूष गोयल यांनी या आंदोलनात माओवादी नक्षलवादी शिरल्याच्या केलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी असे असेल तर याची चौकशी व्हावी, अशी मागणी सुद्धा केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे रविवारी एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आले होते. सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांच्याच हिताचा आहे. अडाणी अंबानी यांना मोठे करण्याचा प्रश्नच येत नाही. ते आधीच मोठे आहेत. या कायद्यात शेतकऱ्यांना ज्या काही सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परंतु सुधारणा करण्यास तयार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास दोन पाऊल पुढे यावे, असे ते म्हणाले.

पत्रपरिषदेत महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे

यावेळी आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकट्याच्या ताकदीवर सत्ता येऊ शकत नाही. आठवले यांनी यावेळी शरद पवार यांना दोन वेळा काँग्रेसने पंतप्रधानपद नाकारल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल्याचे सांगत पवार यांना आम्ही आधीच एनडीए मध्ये येण्याची विनंती केली होती. ते एनडीएमध्ये आले तर राज्याला व देशालाही फायदा होईल, असे सांगितले.