शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरची महाग, भाज्या स्वस्त

By admin | Updated: May 18, 2015 02:40 IST

मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे.

नागपूर : मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे. परिणामी स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. भाव गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आहेत. गृहिणींना आवडीच्या भाज्या सहज उपलब्ध होत आहेत. स्थानिक उत्पादकांकडील हिरवी मिरची संपली आहे. बाहेरून माल येत असल्यामुळे मिरची महाग आहे. रविवारी कॉटन मार्केट बाजारात प्रति किलो भाव ३५ ते ४० रुपये होते, तर स्थानिक बाजारात ५० रुपये किलो विक्री झाली. सांभार २५ रुपये किलो भाव होते. याशिवाय वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, शेंगा, तोंडले, परवळ स्वस्त असल्याने ग्राहकांकडून मागणी आहे. कॉटन मार्केटमध्ये दररोज १५० ते १७५ लहानमोठ्या गाड्यांची आवक असून उन्हाळ्यात भाज्या आटोक्यात राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. कांदे महाग, बटाटे स्वस्तयावर्षी पावसामुळे पीक खराब झाल्याने उत्पादन कमी आहे. गेल्या काही दिवसांत कांदे महाग झाले आहेत. कळमना ठोक बाजारात लाल आणि पांढरे कांदे ५०० ते ५५० रुपयांवर (४० किलो) गेले असून किरकोळमध्ये भाव प्रति किलो २० रुपये आहेत. गेल्यावर्षी याच काळात कांदे ३०० ते ३५० रुपये होते. भाव वाढून प्रति किलो प्रति किलो ३० रुपयांवर गेले होते. यंदा पांढरा कांदा आणखी महाग होईल, अशी प्रतिक्रिया कळमना येथील आलू कांदे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सध्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून पांढरे कांदे तर बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यातून लाल कांद्याची आवक आहे. गुजरात आणि धुळे जिल्ह्यात काद्यांचे पीक फारच कमी आहे. सध्या सरासरी २० मोठ्या ट्रकची आवक आहे. यंदा बटाट्याचे विक्रमी पीक झाल्याने भाव फारच कमी आहेत. कळमन्यात दर्जानुसार ३०० ते ४०० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे बटाटे प्रति किलो १२ ते १५ रुपयांदरम्यान आहेत. सरासरी १६ ते २० ट्रकची आवक कानपूर, आग्रा आणि अहमदाबाद येथून माल येत आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बटाट्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि पीकही चांगले आले. यंदा गुजरात आणि पश्चिम बंगाल येथेही बटाट्याचे पीक जास्त आले आहे. शीतगृहातही माल पडून आहे. त्यामुळे यंदा भाववाढीची शक्यता नाही, असे वसानी म्हणाले. (प्रतिनिधी)