शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

बिबट्याच्या भीतीपेक्षा मुलांची चिंता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

नागपूर : कधी नव्हे, तो या परिसरात बिबट्या आला, तो अजूनही सापडला नाही, याची भीती आम्हाला आहेच, पण त्यापेक्षाही ...

नागपूर : कधी नव्हे, तो या परिसरात बिबट्या आला, तो अजूनही सापडला नाही, याची भीती आम्हाला आहेच, पण त्यापेक्षाही अधिक काळजी अंगणात आणि परिसरात खेळणाऱ्या आमच्या लहान मुलांची आहे, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली सुरेश कोहळे यांनी!

अंबाझरी, एनआयटी ते आता महाराज बाग परिसर असा प्रवास करीत असलेला बिबट्या अद्यापही वनविभागाला सापडलेला नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भीती आणि चिंता व्यापली आहे. सहा दिवसांपासून शहरात शिरलेला बिबट्या आता चक्क शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचला आहे. दोन दिवसांपासून तो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात वावरत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, ही भावना व्यक्त झाली. पीकेव्ही कर्मचाऱ्यांची वसाहत अगदी नाल्यालगतच आहे. लागूनच दाट झाडी आहे. या परिसरात सायंकाळी पिंजरा लावण्यात आला.

पीकेव्हीचे कर्मचारी राजेश अंबाडे म्हणाले, ही वसाहत रात्री निर्मनुष्य असल्यासारखी होते. त्यामुळे भीती वाढली आहे. वनविभागाने या परिसरात सुरक्षा पथक ठेवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राहुल बोरसरे हा मूर्तिकार युवक म्हणाला, सायंकाळी जेवल्यानंतर आम्ही सर्व जण मुक्तपणे फिरायचो. आता ते बंद झाले आहे. लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. नरेंद्र मेश्राम म्हणाले, वनविभागाने अद्याप आम्हाला कसल्याही सूचना दिलेल्या नाहीत. आम्हालाच काळजी घेऊन वावरावे लागणार आहे. सायंकाळनंतर क्वार्टरबाहेर अंगणार येणेही जोखमीचे झाले आहे.

या परिसराला लागूनच गवळीपुरा आहे. येथे सुमारे ७०० ते ८०० नागरिक राहतात. बहुतेकांची घरे नाल्याच्या काठावर असून, अनेकांकडे गायी व म्हशी आणि बछडे आहे. यामुळे गवळीपुऱ्यातही बिबट्याची दहशत पसरली आहे. गवळीपुरातील पंकज सिरसवार दुधाचा व्यवसाय करतात. ते म्हणाले, असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आमच्या जनावरांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने काळजी वाटते. वनविभागाने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. दीपक सिरसवार महणाले, आमची जनावरी आम्ही उघड्यावरच बांधतो. दोन दिवसांपासून रात्री आळीपाळीने जागून जनावरांवर लक्ष ठेवत आहोत. नाल्याच्या परिसरात दाट झाडी असल्याने तो दिवसाही दिसणे कठीण आहे. त्यामुळे वनविभागाने त्याला पकडण्यासाठी उपाययोजना करावी.

...

आता डुकराच्या शिकारीबद्दलच शंका!

सोमवारच्या रात्री रानडुकराची शिकार केलेली आढळली. मात्र, ही शिकार बिबट्याकडूनच झाली असावी, याबद्दल आता वनविभागातील काही अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी शंका व्यक्त करीत आहेत. शिकार केल्यावर संबंधित वाघ-बिबट पुन्हा त्या ठिकाणी येऊन शिकार सुरक्षित असल्याची खात्री करतात. मात्र, या घटनेत तसे झाले नाही. शिकार केल्यानंतर बिबट्या आपली शिकार उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवतो. तेथे तसे घडले नव्हते. शिकार करताना आधी गळा पकडला जातो. डुकराच्या गळ्यावर दाताचे व्रण आहेत, पण त्याबद्दलही पशुवैद्यकांना शंका आहे. ज्या पद्धतीने शिकार खाण्यात आली, त्यावरही अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. असे असले, तरी बिबट या परिसरात दोन दिवसांपूर्वी दिसला, हे तेवढेच सत्य आहे. वेगवेगळ्या घटनेतील त्याचे प्रत्यक्षदर्शीही आहेत. पावलांचे ठसे, भिंतीवर ओरखडे, कुत्र्यांसोबत केलेल्या झटापटीत जखमी कुत्र्यांच्या शरीरावर आढळलेले व्रण, या बाबी मात्र तेवढ्याच सत्य आहेत.

...