शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळांत राबविणार बाल स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 13, 2014 00:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक

१४ ते १९ दरम्यान विविध कार्यक्र म : सेवाभावी संस्थांचे सहकार्यनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांतून बाल स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महापालिका शाळांतून ही मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती शिक्षण सभापती चेतना टांक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. १४ नोव्हेंबर या बालक दिनापासून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर, स्वच्छ व संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ शौचालय उपक्रमांचा समावेश आहे.जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहे. शासनाचे आदेश म्हणून नव्हे तर शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी महापौर प्रवीण दटके यांनी बैठक घेतली. स्वच्छ शाळेला महापौर चषक प्रदान केला जाणार असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. शाळांमध्ये अस्वच्छता होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहे. मनपाच्या २८ माध्यमिक व १६६ प्राथमिक शाळांतून ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेला जेसीआय आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. मोहीम संपल्यानंतर दर १५ दिवसांनी शाळांना भेट देण्याची सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी बैठकीत केली. विद्यार्थ्यांना जेसीआय व ग्रीन व्हिजिल व्याख्यान व पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार. तसेच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे घर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पत्रपरिषदेला परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, डॉ. कविता रतन यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)