शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वेकोली बंकर परिसरात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच असलेल्या विजेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित असला तरी मुले या परिसरात राेज खेळतात. याकडे वेकाेली प्रशासनाचे मुळीच लक्ष नसते. ही दुर्दैवी घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा काेळसा खाण परिसरात मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नक्ष आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, सिल्लेवाडा येथील शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हाेता. वेकाेलीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बंकर क्रमांक-५ परिसरात एका रांगेत रेतीचे २५ ते ३० फूट उंच ढिगारे आहेत. त्यावर चढणे व घसरत खाली येणे मुलांसाठी आनंददायी असल्याने रेतीचे ढिगारे त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. यातील काही ढिगाऱ्यांवरून व जवळून विजेच्या हाय व्हाेल्टेज तारा गेल्या आहेत. काही ढिगारे तारांपेक्षाही उंच आहेत.

नक्ष त्याच्या पाच समवयस्क मित्रांसाेबत या ढिगाऱ्यावर राेज खेळायला जायचा. यातील एका ढिगाऱ्यावर खेळत असताना त्याचा हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श हाेताच क्षणभरात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी घराच्या दिशेने पळ काढला. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून वेकाेली प्रशासनाने नक्षच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरेे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

मुळात हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही. घटनास्थळापासून १०० मीटरवर प्रवेशद्वार असून, तिथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. असे असताना मुले राेज या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळायला यायची. त्यांना आजवर एकाही सुरक्षारक्षकाने आत येण्यास प्रतिबंध केला नाही. सुरक्षारक्षकांनी मुलांना आत येऊ दिले नसते तर नक्षचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे वेकाेलीच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.