शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुख्यमंत्र्यांनी सत्तेत घेतल्याने मरणासन्न काँग्रेस, राष्ट्रवादी जिवंत झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 07:10 IST

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सेनेविरोधात उमेदवार उभे केल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरच जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देशिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांचा सत्तेतील मित्रपक्षांवरच घणाघात काँग्रेस शिवसेनेला डिवचत असल्याचा आरोप

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सेनेविरोधात उमेदवार उभे केल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरच जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अक्षरश: मरणपंथाला लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सरकारमध्ये घेतल्यामुळे ते जिवंत झाले, या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. अगोदर कॉंग्रेस नेते आशिष देशमुखांनी केलेला भाजपचा प्रचार व आता आशिष जयस्वाल यांनी केलेला घणाघात यामुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांत नागपूर जिल्ह्याचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. (Ashish Jaiswal)

मनसर येथे त्यांनी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी जयस्वाल यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अशी गळती लागली होती की, त्यांना कुत्रेही विचारत नव्हते. सत्तेत आल्यामुळे मेलेले लोक जिवंत झाले. हेच कॉंग्रेसचे लोक शिवसेनेच्या मतदारसंघात आमच्याच लोकांना डिवचत आहेत. एकेकाशी मी पुरून उरेन. रामटेकमध्ये होत असलेला हा प्रकार मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरदेखील टाकला आहे. कॉंग्रेसचे लोक जितके त्रास देतील त्याची परतफेड शिवसेना व्याजासह करण्यात सक्षम आहे, असे प्रतिपादन जयस्वाल यांनी केले.

जयस्वालांचा नेमका रोख कुणावर ?

भाषणादरम्यान जयस्वाल यांनी कुठल्याही नेत्याचे नाव न घेता पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप लावला. पदावर असो किंवा नसो सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करतात. पदासाठी आम्ही भुकेले नाही. लोकांच्या कानशिलावर बंदूक लावून मते घेतलेली नाहीत. इतर पक्षांतील लोक पदाचा उपभोग करणारे असून निवडणूक आली की घराबाहेर निघतात, या शब्दांत टीका केली. त्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे होता याबाबत चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जैस्वाल