शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...

By admin | Updated: August 3, 2015 02:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात.

तक्रारीची घेतली दखल : शहरात दहशतीचे वातावरण नकोनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. यामुळेच दरवेळी मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणी मांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी रामगिरीवर गर्दी केली. अशातच एका महिलेने आपल्याला समाजकंटकाकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखल घेतली. तातडीने पोलीस आयुक्तांना फोन लावण्याच्या सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा त्वरित बंदोबस्त करा, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि महिलेच्या चेहऱ्यावर सीएम आपलेच असल्याचे समाधान झळकले. रविवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्याच्या सूचना हैदराबाद हाऊस येथील सचिवालयाला दिल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रविवारी सुमारे ४५० नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले गऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले व शक्य तेवढ्या प्रकरणात यंत्रणेला निर्देश देत तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना दिवसभर भेटणाऱ्यांमध्ये अपंग संघटनांचे प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अशा अनेकांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काहींचे प्रश्न तत्काळ निघाली निघाले. (प्रतिनिधी)सर्वांना येऊ द्या लोक दुरून येतातमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रामगिरीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचीही मोठी संख्या होती. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्वांनाच आत सोडत नव्हती. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वांना आत येऊ देण्याचे निर्देश दिले. ‘सर्वांना येऊ द्या, लोक खूप दुरून येतात. त्यांची कामे आपण केलीच पाहिजे. मोठ्या आशेने ते येतात. त्यांना अडवू नका’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आत बोलावून घेतले. या वेळी रामगिरीत प्रवेश मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.