शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिले आत्मनिर्भरतेचे सूत्र; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: April 2, 2025 21:35 IST

युगंधर शिवराय पुस्तकाचे प्रकाशन

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व लढाया माहिती आहे. मात्र त्यामागील नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे आरमार, किल्ले, लांब पल्ल्याच्या तोफांसाठीचे तंत्रज्ञान यातून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसून येत होते. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले. त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या, मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलेलो नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. दिवंगत शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते डॉ.सुमंत दत्ता टेकाडे यांच्या युगंधर शिवराय या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉ.श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, दत्ता शिर्के, माधवी सुमंत टेकाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सिकंदराच्या काळापासून आपल्या देशावर आक्रमणाचा क्रम सुरू झाला व बाहेरून आलेल्या मुघलांनी इस्मामच्या नावावर सर्व उद्धस्त करण्यावरच भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे देशातील पारतंत्र्याचे युग बदलले. छत्रपती शिवरायांनी केवळ तत्कालिनच नव्हे तर भविष्यातील भारतालादेखील दिशा दिली. त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दीच संपली, असे सरसंघचालक म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्राबाबतची संकल्पना स्पष्ट होती. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे व त्यासाठी शिवचरित्र किर्तनकार समाजात असणे आवश्यक आहे. किर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नाही तर त्यामागे सामाजिक तंत्र आहे याकडेदेखील सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी मुधोजीराजे भोसले,डॉ.श्याम धोंड यांनी डॉ.सुमंत टेकाडे यांच्या प्रवासावर भाष्य केले. माणिक ढोले यांनी प्रास्ताविक केले, तर वैशाली उपाध्ये यांनी शिवमहिमा गायन केले. डॉ.सतिश चाफले यांनी संचालन केले तर दत्ता शिर्के यांनी आभार मानले.

संघासाठी हनुमान व छत्रपती शिवरायच मूर्त आदर्शसंघाचे काम तत्वरूप असून व्यक्तीवादाला येथे जागा नाही. जर साकार व मूर्त आदर्श डोळ्यासमोर ठेवायचेच असतील तर संघात दोनच जणांना मानले जाते. त्यात हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेच आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.

शिवरायांचे कमीत कमी दोन गुण तरी बाळगाछत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या युगाचे आदर्श पुरूषच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना किंवा ऐकताना त्याचे अनुकरण करण्यावर भर असला पाहिजे. आपण त्यांचे सर्व नाही, पण कमीत कमी दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत