शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिले आत्मनिर्भरतेचे सूत्र; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: April 2, 2025 21:35 IST

युगंधर शिवराय पुस्तकाचे प्रकाशन

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व लढाया माहिती आहे. मात्र त्यामागील नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे आरमार, किल्ले, लांब पल्ल्याच्या तोफांसाठीचे तंत्रज्ञान यातून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसून येत होते. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले. त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या, मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलेलो नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. दिवंगत शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते डॉ.सुमंत दत्ता टेकाडे यांच्या युगंधर शिवराय या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉ.श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, दत्ता शिर्के, माधवी सुमंत टेकाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सिकंदराच्या काळापासून आपल्या देशावर आक्रमणाचा क्रम सुरू झाला व बाहेरून आलेल्या मुघलांनी इस्मामच्या नावावर सर्व उद्धस्त करण्यावरच भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे देशातील पारतंत्र्याचे युग बदलले. छत्रपती शिवरायांनी केवळ तत्कालिनच नव्हे तर भविष्यातील भारतालादेखील दिशा दिली. त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दीच संपली, असे सरसंघचालक म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्राबाबतची संकल्पना स्पष्ट होती. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे व त्यासाठी शिवचरित्र किर्तनकार समाजात असणे आवश्यक आहे. किर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नाही तर त्यामागे सामाजिक तंत्र आहे याकडेदेखील सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी मुधोजीराजे भोसले,डॉ.श्याम धोंड यांनी डॉ.सुमंत टेकाडे यांच्या प्रवासावर भाष्य केले. माणिक ढोले यांनी प्रास्ताविक केले, तर वैशाली उपाध्ये यांनी शिवमहिमा गायन केले. डॉ.सतिश चाफले यांनी संचालन केले तर दत्ता शिर्के यांनी आभार मानले.

संघासाठी हनुमान व छत्रपती शिवरायच मूर्त आदर्शसंघाचे काम तत्वरूप असून व्यक्तीवादाला येथे जागा नाही. जर साकार व मूर्त आदर्श डोळ्यासमोर ठेवायचेच असतील तर संघात दोनच जणांना मानले जाते. त्यात हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेच आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.

शिवरायांचे कमीत कमी दोन गुण तरी बाळगाछत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या युगाचे आदर्श पुरूषच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना किंवा ऐकताना त्याचे अनुकरण करण्यावर भर असला पाहिजे. आपण त्यांचे सर्व नाही, पण कमीत कमी दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत